आर्णी,दि.23-‘एकीकडे देशाचा पोशिंदा सततच्या नापीकीने हवालदिल असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना जाहीरपणे शिव्या देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना हातात तलवार घेण्याची वेळ आणू नका, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. सत्ताधाऱ्यांना बदलवण्यासाठी आसूड यात्रेचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आल्याचेही आमदार बच्चू कडू यांनी या वेळी सांगितले. आर्णी तालुक्यातील दाभडी येथून सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आसूड यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.