Home Featured News गोंदियावरुन जाणारी वैष्णवदेवी विशेष रेल्वे रद्द

गोंदियावरुन जाणारी वैष्णवदेवी विशेष रेल्वे रद्द

0

गोंदिया-गोंदिया येथील श्री वैष्णव देवी यात्रा समितीच्यावतीने 6 नोव्हेंबर रोजी विशेष रेल्वेगाडीने गोंदिया परिसरातील 1500 भावीक देवीच्या यात्रेकरीता रवाना होणार होते.त्यासाठी समितीच्यावतीने बिलासपूूर रेल्वे मंडळाशी करार करण्यात आला होता.या करारापोटी सूमारे 72 लाख द्यावयाचे होते.सुरवातीला 20 लाख रुपये दिल्यानंतर गाडी बुक करण्यात आली.नंतर काही कारणाने गाडी रद्द करण्यात आली होती.परंतु समितीला विशेष ट्रेन मिळत नसल्याचे कळताच त्यांनी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे साकडे घातले.पटेलानी लक्ष घालून रेल्वेगाडीची सुविधा करुन दिल्याचे समितीतील काही सदस्यांचे म्हणने आहे.त्यानुसार ही रेल्वेगाडी बिलासपूरवरुन गुरुवारी रात्री 8 वाजता गोंदिया स्थानकावर पोचली.
20141106_225333
रात्री 9 वाजता दरम्यान यात्रेच्या या विशेष गाडीला झेंड़ी दाखविण्याकरीता खासदार नाना पटोले आले असता या गाडीला जो़डण्यात आलेल्या प्रेंट्री कार(रसोईयान)मध्ये स्वयपाक करण्यास अडचणी येणार असल्याचे लक्षात येताच समितीच्या पदाधिकार्यानी खासदार पटोले यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यानंतर त्या पेंट्रीकार एैवजी रसोईयान लावून देण्याची मागणी करण्यात आली विशेष म्हणजे करारपत्रात रसोईयानचा स्पष्ट उल्लेख असताना रेल्वेने रसोईयान असलेला डब्बा दिला नाही.त्यातच 120 सीट अधिक डब्बे असलेली गाडी देऊन समितीकडून अधिकचे भाडेही वसुल केले त्यामुळे चिड़लेल्या समितीने रेल्वेगाडी बदलून देण्यासाठी हट्ट धरला.खासदार नाना पटोले यांनीही बिलासपूर रेल्वेच्या अधिकायाशी दुरध्वनीवर सतत चचार् केली त्याना महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी यात्रेसाठी देण्याची मागणी केली ते होत नसेल यात्रेकरुना रेल्वेच्या चुकीमूळे हा प्रकार घडला असल्याने रेल्वेने या यात्रेकरुना निशुल्क जेवण उपलब्ध करुन द्यावे अशीही भूमीका मांडली.परंतु रेल्वेचे अधिकारी खासदाराचेही मानायाला तयार दिसून आले नाही.विशेष म्हणजे हा सवर् प्रकार सुरु असताना गोंदिया रेल्वेस्थानकाच्या सल्लागार समिती व रेल्वे मडंळ सद्स्य असलेले एकही सदस्य मात्र रेल्वेस्थानकावर आले नाही.ही यात्रा कुठल्या एका पक्षाची नव्हती परतु त्यालाही राजकीय रंग देण्याचा काही लोक प्रयत्न करताना दिसून आले.खासदार रात्री उशीरापयर्ंत रेल्वेस्थानकावर यात्रेकरु आणि समितीच्या सदस्यासोबंत समाधानकारक मागर् काढण्याचे प्रयत्न करीत राहिले परंतु रेल्वेच्या हेकेखोरपणामूळे समाधान न निघू शकल्याने शेवटी यात्रा समितीने ही यात्राच रद्द करीत विशेष गाडी रद्द केली.खासदार पटोले हे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे येथील भाजप नेत्यांना कळूनही शहर अध्यक्ष,महामंत्रीसह अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.

Exit mobile version