Home मराठवाडा मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाताना अपघात,एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाताना अपघात,एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

0

लातूर – मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार पलटी झाली, त्यामुळे हा अपघात झाला.

*निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार पटली झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भिषण होता की कार पलटी होऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली आहे. अपघातातील लोक हे चाकूर येथील रहिवासी आहेत. मुलीच्या सोयरीकीच्या कामांसाठी औरादकडे जात होते अशी प्राथमिक माहीती समोर आली आहे. जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

*भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी हे कुटुंब निघाले होते, त्याच वेळी काळाने घाला घातला.

Exit mobile version