Home राजकीय विजय चौगुलेंना बलात्कारप्रकरणी कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक!

विजय चौगुलेंना बलात्कारप्रकरणी कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक!

0

नवी मुंबई -शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका 24 वर्षीय तरूणींचे मागील 5 वर्षापासून लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी चौगुले यांच्यावर मागील महिन्यात सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, चौगुले यांनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

गुरुवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे चौगुलेंना तरूणीवर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान, चौगुले यांनी मी निर्दोष असून, आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत या प्रकरणातून मी निर्दोष सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही पदावर राहणार नाही व घेणार नाही. एक शिवसैनिक म्हणून काम पाहत राहील असे चौगुले यांनी म्हटले आहे. सीबीडी बेलापूर पोलिस चौगुलंचा शोध घेत आहेत, सध्या ते फरार आहेत.

एका 24 वर्षीय तरूणीचे मागील 5 वर्षापासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत संबंधित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरूणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विजय चौगुले यांनी मागील 5 वर्षापासून आपले लैंगिक शोषण केले आहे. पाच वर्षापूर्वी एका कामानिमित्त आपण त्यांना भेटलो होतो. त्यानंतर त्यांनी मला माझे काम करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क आला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी मला बोलावून माझे लैंगिक शोषण सुरु केले. तसेच याबाबत कोठे जाहीर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे आपण हा अन्याय आजपर्यंत सहन केला, असेही या तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.

विजय चौगुले हे शिवसेनेचे नवी मुंबईतील जिल्हाप्रमुख आहेत. चौगुले हे सेनेतील मोठे नेते असले तरी त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त व गुन्हेगारीविषयक राहिली आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी चौगुले यांचे तिकीट कापत राजन विचारे यांना संधी दिली होती. त्यात विचारे यांनी विजय मिळविला आहे. 2009 साली चौगुले यांना सेनेने तिकीट दिले होते त्यामुळे सेनेचा तेथे पराभव झाल्याचे सांगण्यात येत होते. सेनेला चौगुले यांच्या गुंडगिरीचा फटका बसला होता. चौगुले यांच्यावर हत्या करण्यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तताही करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यात पक्षाला फटका बसू नये यासाठी उद्धव ठाकरेंशी चर्चा करूनच त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला असण्याची शक्यता आहे

Exit mobile version