
हरिद्वार:-उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे. हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना घडली. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मनसा देवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज रविवारी सकाळी ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रचंड गर्दीमुळे मंदिरात चेंगराचेंगरी झाली आणि यात 6 लोकांचा जीव गेला. घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. मंदिरातील बचावकार्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.
मनसा देवी मंदिर हे उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. इथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषत: श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होतात. आता मनसा देवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर उत्तराखंड सरकारने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरांमध्ये गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी पीडितांना आवश्यक ती मदत पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. उत्तराखंड सरकार आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पीडितांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत.





