36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News कोरोना प्रभाव कमी झालेल्या ग्रापंच्या निवडणुकासाटी निवडणूक आय़ोग करतेय चाचपणी

कोरोना प्रभाव कमी झालेल्या ग्रापंच्या निवडणुकासाटी निवडणूक आय़ोग करतेय चाचपणी

0
149

blank

गोंदिया,दि.१८::महाराष्ट्र राज्यातील १२ हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. परंतु कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या गावात राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूका घेण्याबाबत चाचपणी सुरु केली असून ग्रामपंचायत निवडणुका घेता येतील का? याबाबतचा अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे निवडणुका होतील का याकडे आता लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने सुरुवातील गावातीलच एका व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र याला कोर्टात आव्हान देण्यात आल्याने हा निर्णय रद्द करत शासकीय अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्यात आली आहे

blank