जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून अर्ज होतात गहाळ

भोंगळ कारभारामुळे पोलिस विभागाच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह

0
614

गोंदिया ,दि.२४: पोलिसांकडून अर्जदाराला न्यायाच्या अपेक्षा असते. त्यातही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून न्याय मिळेल, असा विश्वास अर्जदारांंना असतो. मात्र गोंंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक कारभारामुळे विश्वासहर्तेवर प्र्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. कोणत्याही कामाचे कार्यालयात दिलेले अर्ज गहाळ होत असल्याची प्रत्यक्ष अनुभूती सकाळ,देशोन्नती,महाराष्ट्र टाईम्स,बेरार टाईम्सच्या प्रतिनिधीनी घेतली आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक  हे कार्यालयातील कामचुकारपणा दाखविणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करतील काय? याकडेही लक्ष लागले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांमार्फत जिल्ह्यातील पोलिस विभागाचा कारभार चालतो. जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यातून न्याय मिळाले नाही तर फिर्यादी मोठ्या विश्वासाने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतात, मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत अनेक विभागाच्या कर्मचार्‍यांकडून एकमेकाकडे बोट दाखवून अंग काढून घेतले जाते. परिणामी  अर्जदाराला आमच्या अर्जाचे काय झाले हि विचारायची वेळ येते तेव्हा तुमचे अर्ज पत्र आमच्याकडे नाहीत असे सांगायला मात्र विसरत नसणार्या या विभागाकडून वृत्तपत्र प्रतिनिधीनाच असे सांगितले जात असेल तर सर्व सामान्यांचे काय हाल होत असतील हे सांगायची गरजच पडणार नाही. एवढेच नव्हेतर  अर्जही संबंधित विभागाकडे पोहचते केले जात नाही. जेव्हा कसलीही कारवाई होत नाही, तेव्हा अर्जदार कार्यालयात दाखल झाला तर तुमचे अर्जच नाही, असे सांगून त्या फिर्यादीला परत पाठविले जाते. हा प्रकार वृत्तपत्र प्रतिनिधीनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात प्र्रत्येक्ष अनुभवला. विशेष म्हणजे या प्रकाराचीही माहिती अप्पर पोलिस अधिक्षक व निवासी उपपोलिस अधीक्षक यांच्यापर्यंत पोहचविल्यानंतरही आम्ही अर्ज शोधूून घेऊ एवढेच बोलून  समाधान केले जाते. या प्रकारामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षकांचे दुुर्लक्ष होत आहे,याकडे पालकमंत्री व राज्याचे गृह मंत्री यांनी ही लक्ष देण्याची गरज झाली आहे.