
मुंबई,दि.05ः- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्यावर झालेल्या आरोपामुळे आणि उच्च न्यायालयाने CBI ने 15 दिवसांत प्राथमिक तपास करावा असे निर्देश मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर डॉ. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना सोमवारी दिल्याने आपण या पदावर राहणं योग्य नसल्याचे पत्रात म्हणत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.





