भाटव्याने केला साळ्याचा खून

0
47

अर्जुनी-मोरगाव, दि.3 : पती-पत्नीचे भांडण सुरू होते. मुलगा आला आणि तुम्ही भांडण करू नका असे म्हटले. त्यावरून बापाने त्याला शिवीगाळ करणे सुरू केले. तेव्हा मुलाच्या मामाने येवून तू भाचाला शिवीगाव करू नको, असे म्हटले. मात्र क्रोधित झालेल्या भाटव्याने आपल्या साळ्याच्या पोटात चाकू बोसकून चक्क खूनच केला. नात्याला कलंकित करणारी ही घटना मंगळवार, 1 जून रोजी दुपारी 2.30 वाजता केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या प्रतापगड येथे घडली.

अब्दुल कादिर रशीद शेख (वय 52) रा. प्रतापगड असे आरोपीचे नाव आहे. तर गौस मोहंमद अजीज मोहंमद शेख (वय 52) रा. प्रतापगड असे मृतकाचे नाव आहे.मृतकाची पत्नी नाजिया शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे पती जन्मापासून प्रतापगड येथेच राहतात. त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाल्याने त्या आपआपल्या सासरी राहतात. मृतकाच्या घराशेजारीच त्याची बहीण सलमा कादीर शेख, जावई कादीर रशीद शेख व मुलगा आरीफ शेख मागील 23 वर्षांपासून राहतात.

मंगळवार, 1 जून रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास कादीर शेख व त्यांची पत्नी सलमा यांच्यामध्ये पैशावरून भांडण सुरू झाले. मुलगा आरीफ बाहेरून आला व आपल्या वडिलांना तू कशाला पैसे मागतोस, असे बोलला. मात्र कादीरने तू येथून निघून जा, असे बोलल्याने मुलगा बाहेर चौकाकडे निघून गेला.परंतु, कादीर शेखचे पत्नी व मुलाला शिवीगाळ देणे सुरूच होते. यावर कादीरचा साळा त्यांच्या अंगणात येवून कशाला शिवीगाळ करतोस, असे बोलला. मात्र कादीरने उलट त्यांनाच मारझोड करणे सुरू केले. तसेच कमरेखाली लपवून ठेवलेला चाकू काढून आपल्या साळ्याच्या पोटात भोसकले. त्यातच तळफळत त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी कादिर रशीद शेख याने आपल्या घराच्या शेजारी राहणारा आपला साला(शालक) गौस मोहंमद अजीज मोहंमद शेख यास घरगुती किरकोळ भांडणात रागाच्या भरात चाकूने पोटावर वार करून खून केला. मृतकाच्या पत्नीच्या अशा तक्रारीवरून भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. केशोरी पोलिसांनी आरोपी अब्दुल कादिर रशीद शेख यास ताब्यात घेतले आहे.