
, 14 वेळच्या विजेत्या इंडोनेशियाला 3-0 ने चारली धूळ
भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषकाच्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात 14 वेळच्या विजेत्या इंडोनेशियाला 3-0 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. भारताने तब्बल 73 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली होती. त्यात भारताने एकहाती बाजी मारली. भारताने सिंगल्स, डबल्सनंतर दुसरा सिंगल्सही आपल्या नावे केला. यात किदांबी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टी याचा 21-15, 23-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
चिराग-सात्विक साई राजच्या जोडीने पहिला सेट गमावल्यानंतर डबल्सचा सामना जिंकला

तत्पूर्वी, फायनलच्या अन्य एका सामन्यात भारताने सिंगल्स सिंगल्स गमावल्यानंतर डबल्सचा सेट आपल्या नावे केला. चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकीरेड्डीच्या भारतीय जोडीने पहिला सेट गमावला. त्यानंतर सलग दुसरा व तिसरा सेट जिंकून सामना आपल्या नावे केला.
डबल्सच्या पहिल्या सामन्यात चिराग शेट्टी व सात्विकचा पराभव झाला. इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसन व केविन संजया सुकामुलजोच्या जोडीने सेट अवघ्या 17 मिनिटांतच 21-18 ने आपल्या नावे केला. त्यानंतर भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट 23-21 ने आपल्या नावे केला. त्यानंतर तिसरा सेटही त्यांनी 21-19 ने आरामात जिंकला.
पहिला सिंगल्स लक्ष्य सेनने जिंकला
पहिल्या सिंगलमध्ये लक्ष्य सेनने अँतोनी सिनिसुका गिनटिंगचा 8-21, 21-17, 21-16 ने पराभव केला. पहिल्या सेटमध्ये लक्ष्यला अँथोनी सिनिसुकाकडून 8-21 ने पराभव पत्करावा लागला. एकवेळी हा सामना 8-7 असा रंगात आला होता. पण, त्यानंतर अँथोनीने सलग 12 पॉईंट जिंकून लक्ष्यला एकप्रकारे सामन्यातून बाहेर फेकले होते. त्यांनी अवघ्या 16 मिनिटांत सेट आपल्या नावे केला.
त्यानंतर लक्ष्यने शानदार वापसी करत दुसरा सेट आपल्या नावे केला. त्यात त्याने 21-17 अशी सरळ बाजी मारली. त्यानंतर तिसरा गेमही त्याने 21-16 ने आपल्या नावे करुन भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.

सेमीफायनलमध्ये जखमी झाल्यानंतरही एच.एस. प्रणयने मिळवला विजय
भारताच्या एच.एस. प्रणयने जखमी झाल्यानंतरही सेमीफायनलमध्ये कोर्टवर उतरुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. डेन्मार्क विरोधातील सेमीफायलमध्ये पहिल्या 4 सामन्यानंतर दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीवर होते. शेवटच्या सामन्यात प्रणयच्या पुढे डेन्मार्कचा रासमूस गेमके होता. प्रणयने हा सामना 1 तास 13 मिनिटांत 13-21, 21-9, 21-12 ने आपल्या नावे केला.
फायनलपर्यंत केवळ एका संघाकडून टिम इंडियाचा पराभव
भारताचा थॉमस कपमधील फायनलपर्यंतचा प्रवास अत्यंत शानदार राहिला. भारतीय संघाला फायनलपर्यंत ग्रुप स्टेज मॅचमध्ये केवळ चिनी तायपे विरोधात पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने ग्रुप स्टेज मॅचमध्ये जर्मनी व कॅनडाचा प्रत्येकी 5-0 ने पराभव केला. पण, चिनी तायपेकडून त्याला 2-3 ने पराभवाची चव चाखावी लागली. क्वार्टर फायनलमध्ये 5 वेळच्या विजेत्या मलेशियाला हरवले. तर सेमिफायनलमध्ये सर्वाधिक 32 वेळा फायनल खेळणाऱ्या डेन्मार्कसारख्या संघाला धूळ चारली. डेन्मार्कने 2016 मध्ये हा कप जिंकला होता.
फायनल मॅचसाठी भारतीय संघ
सिंगल्स – लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, एच.एस. प्रणय, प्रियांशु राजावती
डबल्स – सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, विष्णुवर्धन गौड पंजाला-कृष्ण प्रसाद गारगा, एमआर अर्जुन-ध्रुव कपिला
थॉमस कप पहिल्यांदा 1948-49 मध्ये झाला
थॉमस कप आयोजित करण्याची संकल्पना ब्रिटीश बॅडमिंटनपटू सर जॉर्ज एलन थॉमस यांनी मांडली होती. ते 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला एक अत्यंत यशस्वी बॅडमिंटनपटू होते. त्यांची फुटबॉल वर्ल्ड कप व टेनिसच्या डेव्हीस कपच्या धर्तीवर बॅडमिंटनमध्येही पुरुषांसाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा होती. त्यांनी 1948-49 मध्ये इंग्लंडमध्ये सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजन केले होते.
2 वर्षांनी होते स्पर्धेचे आयोजन
थॉमस कप पूर्वी 3 वर्षांनी आयोजित केला जात होता. पण, 1982 मध्ये नियमांत सुधारणा झाल्यानंतर तो दर 2 वर्षांनी आयोजित करणे सुरू झाले. थॉमस कपला पुरुषांचा वर्ल्ड कप मानले जाते.
इंडोनेशियाने सर्वाधिक वेळा जिंकला कप
थॉमस कपचा यंदाचा 32 वा हंगाम आहे. त्यात आतापर्यंत केवळ 5 देशांनाच विजेतेपद मिळाले आहे. इंडोनेशिया थॉमस कपची सर्वात यशस्वी टीम आहे. या संघाने आतापर्यंत 14 वेळा या कपवर आपले नाव कोरले आहे. तर 1982 पासून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या चिनी संघाने 10 वेळा व मलेशियाने 5 वेळा हा चषक जिंकला आहे. जपान व डेन्मार्कनेही प्रत्येकी एकवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. विशेष म्हणजे थॉमस चषक नेहमीच आशियाई देशांनी जिंकला. पण, 2016 मध्ये प्रथमच तो आशियाबाहेरील डेन्मार्कने जिंकला.





