आता राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

0
92

गोंदिया- राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . केंद्र सरकराच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात येणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे . या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो .

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे . तर पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आधीच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात . त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे १२ हजार रुपये मिळू शकणार आहे . दरम्यान योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येणार आहे . राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे . तसेच ही रक्कम टप्प्या – टप्प्यात देण्यात येणार आहे .

शेतक – यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्यासाठी काय अटी असणार हे स्पष्ट नाही . शिवाय केंद्र सरकारने लावलेल्या अटी मुख्यमंत्री किसना योजनेला लागू होणार का , हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही . मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे . आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे . यामध्ये अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत . त्यामुळे मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे . मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली आहे . त्यामुळे या योजनेसाठी विभागीय पातळीवर कामही सुरु झाले आहे .