शिवसेनेच्या मेळाव्याकडे 2 आमदारांनी फिरवली पाठ,एकनाथ शिंदेंकडून स्वीकारला नाही सत्कार!

0
113

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे दोन मेळावे मुंबईत गुरुवारी पार पडले. पण शिंदे गटाच्या मेळाव्यात नाराजीचे सूर पाहण्यात मिळाले.मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे दोन माजी मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी झालेल्या जयंती दिनी शिवसेनेनं मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात “शिवोत्सव मेळावा” आयोजित केला . या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते हजर होते. पण शिवसेना मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दूल सत्तार गैरहजर आहे. शिवसेना मेळाव्यात सर्व विजयी आमदारांचा सत्कार करण्यात आला. मात्र आमदार तानाजी सावंत आणि अब्दूल सत्तार यांनी या सत्कार सोहळ्यास अनुउपस्थित राहून त्यांची नाराजी पुन्हा एकदा उघड केली आहे.

महायुती सरकारच्या खातेवाटपामध्ये तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कापण्यात आला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते हे मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासह प्रमुख काही खातीही भाजपकडे गेली. तसंच भाजपकडून शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यास विरोध झाला होता. ज्या मंत्र्यांना संधी मिळाली होती, त्यांना पुन्हा संधी देऊन नये, अशी मागणी झाली होती. त्यानंतर अखेरीस अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली नाही. तेव्हा पासून दोन्ही नेते प्रचंड नाराज होते.

ठाकरे गटाच्या मेळाव्याकडे राजन साळवींनी फिरवली पाठ

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या मेळाव्यातही नाराजीची सूर पाहण्यास मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी मेळाव्याला गैरहजर होते. राजन साळवी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर गुरूवारी मेळाव्याला न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरेंना राम राम करत राजन साळवी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. यातच गुरूवारी मेळाव्याला गैरहजर राहत साळवींकडून ठाकरेंना संदेश दिला, असल्याची चर्चा रंगली आहे.