37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र ‘इतक्या’ प्रवाशांचा जीव बचावला, रायगडमध्ये नक्की काय घडलं?

‘इतक्या’ प्रवाशांचा जीव बचावला, रायगडमध्ये नक्की काय घडलं?

0
61

blank

रायगड-मुरुड परिसरात समुद्रात १२ बोटींवर संकट ओढावलं होतं. काँग्रेस नेते अजित कुमार (Ajit Kumar) आणि त्यांच्या पत्नीची उपस्थिती असलेल्या या प्रसंगात सुमारे १३४ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. ही घटना समुद्रात अचानक आलेल्या वादळामुळे घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरुडमधील नेते अजित कुमार आणि त्यांची पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मंजू कुमारी हे रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे (Raigad) १३ एप्रिल रोजी बोटीने प्रवास करत होते. त्यांच्या सोबत १२ बोटींमध्ये एकूण १३४ प्रवासी होते. बोटी समुद्रात असताना अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि सुमारे ३० मिनिटांत समुद्र खवळला. यामुळे बोटींना भरकटण्याचा धोका निर्माण झाला होता.

या कठीण वेळी उपस्थित बोटींच्या चालकांनी सतर्कता दाखवली. अजित कुमार यांनी सांगितले की, देवाच्या कृपेनेच आम्ही वाचलो. बोटींवरील नाविकांनी वेळेवर उपाययोजना करून प्रवाशांचे प्राण वाचवले. या सर्व बोटींना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले.

लाइफ जॅकेट्स आणि मदतीमुळे मोठा अनर्थ टळला-

अजित कुमार यांनी सांगितले की, ते आणि त्यांची पत्नी मंजू कुमारी बोटीत (Raigad) मागच्या भागात बसले होते. अचानक वादळामुळे बोटी समुद्राच्या लाटा झेलू शकत नव्हती. मात्र बोटीत उपलब्ध असलेल्या लाइफ जॅकेट्स आणि चालकांच्या सूचनेमुळे प्रवाशांना धीर मिळाला.

तत्काळ मदतीसाठी मुरुड येथील स्थानिक प्रशासन, पोलीस आणि मच्छीमार संघटनेचे सदस्य धावून आले. त्यांनी बोटींना योग्य दिशेने वळवून किनाऱ्यावर आणले. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात समुद्रातील प्रवास करताना सुरक्षेचे नियम आणि यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

blank