समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याशी भेट

0
127

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा
—————–
चित्रा कापसे/तिरोडा —नागपूर-गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवे प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि अन्यायकारक भूमिगत प्रक्रिया याविरोधात आवाज उठवण्यासाठी समृद्धी एक्सप्रेसवे शेतकरी संघर्ष समिती, तिरोडा यांचे शिष्टमंडळ आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री आणि नागपूरचे लोकसभा खासदार नितीन गडकरी यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळात डॉ. दिनदयाल पटले, सतीश पटले आणि संदीप अनकर यांचा समावेश होता. त्यांनी गडकरी साहेबांना एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांवर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये कमी प्रमाणात जमीन अधिग्रहण मोबदला ,वैयक्तिक नोटीसा न देणे, बेकायदेशीर चावडी नोटीसा, पांदन रस्त्यांची व पाण्याच्या प्रवाहाची व्यवस्था न करणे, पुनर्वसनाची प्रलंबित प्रक्रीया यांचा समावेश होता.

गडकरी साहेबांनी निवेदन गांभीर्याने ऐकून घेतले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्यात येईल, आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.