ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा अधिवेशन संपन्न

0
37

20 मे साताराच्या राज्यव्यापी आंदोलनात शामिल होण्याचे आव्हान.
सडक अर्जुनी,    महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) द्वारे जिल्ह्यातील ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सडक अर्जुनी येथे झालेल्या अधिवेशनात यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करुण वेतनश्रेणी, पेन्शन लागू करने, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची व वसुलीची अट रद्द करुण किमान वेतन व भत्त्यावर शंभर टक्के अनुदान राज्य शासनाने देने सह इतर महत्वाच्या मागण्यांना घेवून 20 मे ला ग्रामविकास मंत्री यांचे सातारा स्थित कार्यालयावर बेमुद्दत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना शामिल होण्याचे आव्हान करण्यात आले अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजुर युनियनचे महासचिव कॉ. शिवकुमार गणवीर यांनी केले व कार्यक्रमाची अध्यक्षता चत्रुगन लांजेवार यांनी केली प्रास्ताविक रवींद्र किटे यांनी केले महासंघांचे राज्य कार्याध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस मिलिंद गणवीर यांनी जिल्ह्यातील व राज्यातील होत असलेल्या कार्यक्रमाचा, संघटनेच्या वाटचालीची तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आंदोलनाची मांडणी केली या अधिवेशनात आयटकचे जिल्हा ध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव रामचंद्र पाटील, विवेक काकडे (विद्युत कर्मचारी फेडरेशन) शालूताई कुथे,वर्षा पंचभाई(आशा गटप्रवर्तक), करुणा गणवीर, ललिता राऊत (शापोआ युनियन), पौर्णिमा चुटे (आंगणवाडी कर्म. युनियन) आदी कामगार संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन करत ग्रा. पं. कर्मचाऱ्याबरोबर आपली एकजूट दर्शवली अधिवेशनात मे 5 महिला प्रतिनिधी सह 27 सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची सर्व सम्मतीने निवड करण्यात आली यात चत्रूगण लांजेवार(अध्यक्ष)महेंद्र कटरे (कार्याध्यक्ष), मिलिंद गणवीर (महासचिव), महेंद्र भोयर (कोषाध्यक्ष), आशिष उरकूडे, अशोक परशुरामकर, ईश्वरदास भंडारी, भाऊलाल कटंगकार, (उपाध्यक्ष) रवींद्र किटे(सचिव), विष्णू हत्तीमारे(संघटन सचिव), विनोद शहारे, बुधराम बोपचे(सहसचिव) यांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या अखेर विष्णू हत्तीमारे यांनी आभार मानले.