
गावात तनावपुर्ण वातावरण, पोलिसांचा बंदोबस्त
गोंदिया : ग्रामीण राजकारणातून इतर क्षेत्रातील राजकारणाची दिशा निर्धारित होत असते. परिणामी ग्रामपंचायतच्या निवडणुका व निवडणुका झाल्यानंतर आपले वर्चस्व गाजविण्यासाठी गावातील पुढारी एकवटले दिसतात. त्यातच थेट जनतेतून निवडूण आलेल्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव आणला गेला. त्यासाठी आज ६ जून रोजी विशेष सभेचे आयोजन दरम्यान या सभेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही दोन सदस्यांनी काढता पाय घेतल्याने महिला सरपंचावरील हा अविश्वास प्रस्ताव बारगळला. हा प्रकार जवळील मुर्री ग्रामपंचायतीचा आहे. या प्रकाराने मात्र एकमेकावर जय-पराजयाचे खापरही फोडले जात आहे.
सविस्तर असे की, जवळील नंगपुरा मुर्री येथे थेट जनतेतून सौ. कविता लिचडे या महिला सरपंच म्हणून विचारजमान झाल्या. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या ११ आहे. दरम्यान उपसरपंच योगेश शरणागत यांच्यासह ९ सदस्यांनी सरपंच सौ. लिचडे या सदस्यांना विश्वासात न घेता कार्य करीत असल्याच्या कारणावरून प्रशासनाकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. दरम्यान अविश्वास प्रस्तावाची दखल घेत गोंदिया शहर विभागाचे नायब तहसीलदार कावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज ६ जून रोजी मुर्री येथील ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारस विशेष सभेला सुरुवात करण्यात आली. सभास्थळी सरपंच व त्यांचे समर्थक दाखल झाल्यानंतर अविश्वास प्रस्ताव सादर करणारे सदस्यही दाखल झाले. दरम्यान उपसरपंच योगेश शरणागतही सभास्थळी आल्यानंतर त्यांना कुटुंबातील व इतर काही सदस्यांनी लगेच चोख बंदोबस्त असतांनाही सभा स्थळावरून बाहेर नेण्यास यशस्वी झाले. तर दुसरीकडे एक महिला सदस्य सौ. पालांदुरकर ह्या अनुपस्थित राहिल्या. परिणामी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने फक्त सातच मतदान पडल्याने हा प्रस्ताव बारगळला. एकंदरीत अविश्वास प्रस्ताव पारित व्हावी, यासाठी आमदार विनोद अग्रवाल समर्थकांनी जोरदार षडयंत्र रचण्यात आला होता. मात्र तो षडयंत्र हाणून पाडण्यास सरपंच समर्थकांना यश आले. दरम्यान या वेळी गावात तनावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शिवीगाळ व क्षुल्लक कारणावरून वाद
मुर्री येथील ग्रामपंचायतमध्ये अविश्वास प्रस्तावाला घेवून सुमारे १०० ते १५० पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. सत्ता पक्ष व विपक्षाच्या बाजूने आपली बाजू सरस सरावी, यासाठी कशोसीचे प्रयत्न करीत होते. दरम्यान दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यात शिवीगाळ तसेच क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याचीही चर्चा समोर आली आहे. हे प्रकरण पोलिसात गेले नसले तरी, आजच्या अविश्वास प्रस्तावाने आमदार समर्थकांचा पराभव झाल्याची चर्चा चांगलीच रंगू लागल्याने गावातील वातावरण तापले होते.
००००००