
मुंबई,26 जून 2025- राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन वीज दरामध्ये १० टक्क्यांची मोठी कपात होणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदे मध्ये केली. या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांना महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या वीज बिलात मोठा फरक जाणवणार आहे. असे त्यांनी आपली भाषणातून सांगितले आहे तुझी संपूर्ण माहिती आता जाणून घेऊ.
कोणत्या ग्राहकांना होणार फायदा?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की,”राज्यभरातील घरगुती वीज ग्राहक, लघुउद्योग, तसेच शेतीसाठी वापरणाऱ्या ग्राहकांना दर कपातीतून थेट फायदा होईल.”या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2.5 कोटीहून अधिक वीज ग्राहकांना होणार आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
वीज दर कपात किती होणारं आहे ?
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran) ला दर कपात करण्याचे निर्देश दिले असून, यानुसार:
घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात १०% पर्यंत घट
लघुउद्योग आणि व्यापारी वापरकर्त्यांसाठीही सवलतीचा विचार
शेती पंपांसाठी वीज दरात अतिरिक्त सवलत देण्याचा विचार
महागाईमुळे सामान्य माणसावर आर्थिक ताण येतोय, आणि म्हणूनच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे फक्त वीज दर कमी करणं नाही, तर नागरिकांना दिलासा देण्याचं एक पाऊल आहे.”यामुळे सामान्य लोकांना याचा फायदा होईल आणि त्यांच्या आर्थिक फार कमी होईल 24 दरामध्ये वाढत चाललेला आहे असे त्यांनी म्हटले.
ही वीज कपात कधीपासून लागू होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ही विज दर कपात जुलै 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून लवकरच यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जाहीर होणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून वीज दरवाढीवरून राज्य सरकारवर टीका होत होती. विरोधकांनीही सातत्याने सरकारला घेरले होते. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो.
ग्राहकांनी काय करावे?
महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मोबाईल अॅपवर आपल्या वीज बिलाचा तपशील पाहता येईल. जुलैपासून दर कपात लागू होईल, त्यामुळे ग्राहकांनी त्यानुसार आपले बिल तपासावे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वीज दर कपात हे महाराष्ट्रातील घरगुती ग्राहकांसाठी एक सकारात्मक पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललेले आहे.