स्मशानात अडकलेल्या तिघांना नदीच्या पुराने घेरले

0
32

देवळी: हिंगडोह येथील यशरोदा नदीच्या पुरात शाळकरी मुलासह तिघे जण अडकले होते. पुरात शाळकरी मुलाची सायकल व दुचाकी वाहून गेली. ही बाब लक्षात येताच पालिका अलर्ट मोडतर आली. पालिकेचे अग्निशामक दल, वर्धेची रेस्क्यू टीम तसेच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तियांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित रेस्क्यू केले.आमदार राजेश एकाने, तहसीलदार समर्च क्षीरसागर यांनी भेट देत पूरपरिस्थितीची पाहणी केली. पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने पूरपरिस्थिती गंभीर झाली. रपट्याचे बांधकाम ताहत गेले. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून हा रपटा
काळण्यात आला होता. सध्या डिगडोह गाळाचा संपर्क पूर्णपणे ठप्प झाला आहे.

तिघांचा जीव सापडला होता धोक्यात…
सृजन स्कूलमधील दहावीचा विद्यार्थी भावेश अमोल कापसे हा शाळा करून डिमडोहला जाताना पुरात अडकला, सोचतच उमेश रामदास सासारकर व प्रञ्चल पंडित सावरखेदे हे दोन्ही दुचाकीस्वार, रा. नागझरी हेसुद्धा पुरात अडकले, बचावासाठी तिथेही स्मशानभूमीत आश्रयास थांधले असता पुराच्या पाण्याने वेढा दिला. तिघांचा धोक्यात आला असताना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले.
गावाचा संपर्क तुटला
पुलाचे बांधकाम वर्षभरापासून अपूर्ण आहे. जागोजागी ढिगारे असून, पयर्यायी रस्ता म्हणून रपट्याचे मातीकाम अडचणीचे ठरले आहे. आदी समस्येमुळे पुराचा संभावित धोका असल्याचे तसेच गावाचा संपर्क तुटणार असल्याचे भाकीत ‘लोकमत’ने नुकतेच केले होते. नदीचा हा पूल चाळीस मीटर लांबीचा असून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधण्यात येत आहे. साडेतीन कोटी खर्चाच्या या पुलाचे बांधकाम एक वर्षापासून सुरू आहे. पुलाच्या अडचणीमुळे डिमडोह गावाचा गावाचा संपर्क तुटला आहे.