
गोंदिया,दि.28ः- राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा आठ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर एक मार्च ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत कृषी ऊर्जा पर्व राबवले जाणार आहे. त्यातंर्गत जनजागृतीसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मा.ना. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते एक मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता ऑनलाईनद्वारे या पर्वाचा शुभारंभ करण्यात येणार आहे