Home महाराष्ट्र राज्यात 50 स्मार्ट व्हिलेजची निर्मिती: फडणवीस

राज्यात 50 स्मार्ट व्हिलेजची निर्मिती: फडणवीस

0

मुंबई – महाराष्ट्र राज्यात 2016 च्या अखेरपर्यंत 50 “स्मार्ट व्हिलेज‘ची निर्मिती करण्याचा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. “केवळ स्मार्ट सिटीच नव्हे; तर स्मार्ट व्हिलेजची उभारणी करण्याकडेही आम्ही लक्ष देतो आहोत. या प्रकल्पाची सुरुवात अरिन्सल या गावामधून होणार असून येथे मायक्रोसॉफ्ट कंपनी सरकारला यासंदर्भात मदत करणार आहे. 2016 च्या अखेरपर्यंत अशा प्रकारच्या 50 स्मार्ट व्हिलेजची निर्मिती करण्याचा आमचा यत्न आहे,‘‘ असे मुंबई येथील एका तंत्रज्ञानविषयक परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Exit mobile version