गोंदिया/भंडारा,दि.11 : दसऱ्यापूर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीला घेऊन शिवसेनेने आज सोमवारला राज्यभर मोर्चांचे आयोजन केले होते. गोंदियासह आैरगाबांद,वाशिम,चंद्रपूर,अहमदनगर,रत्नागिरी,सोलापूर,पुणे सह त्या त्या जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या नेतृत्त्वात हे मोर्चे काढण्यात आले.गोंदियात राज्याच्या सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे व राजकुमार कुथे यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसहिंता सुरु असताना शिवसेनेचा हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत पोचल्यावरही पोलिसांचा मात्र कुठेच थांगपत्ता नव्हता.
शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करावे, धान, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके अल्प पावसामुळे नष्ट झाली असून, या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, पीकविमा आणि कर्जमुक्ती अर्जाची तारीख वाढवून देण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.सोबतच गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करुन शेतकर्याना प्रती हेक्टरी 20 हजार रुपयाची मदत करण्यात यावे अशी मागणी सुध्दा करण्यात आली.सोबतच धरणासह उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरक्षित ठेवून कुठल्याही कंपनीला देण्यात येऊ नये असेही म्हटले आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे,उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवार,तेजराम मोरघडे,गजेंद्र फुंडे,डोमाजी बोपचे,निरज रहागंडाले,राज बोबांर्डे,सुरेंद्र नायडू,हर्षल पवार,टिनू मक्कड,सोनू चंद्रवंशी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
भंडारा : शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसऱ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करा या विषयावर शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मुखमंत्री यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. रचनात्मक सुधार करून शेतकऱ्यांना त्रास न देता शक्य तितक्या लवकर दसऱ्यापूर्वीच सर्व शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करण्यात यावे. जर दसऱ्यापूर्वी सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने भव्य तेज विराट आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख यशवंत वंजारी, संदीप वाकडे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख अनिल गायधने, अरविंद बनकर, किशोर चन्ने, भरत वंजारी, राजू ब्राम्हणकर, पवन चव्हाण, विधानसभा प्रमुख महेश पटले, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मनोहर जागळे, शिवसेना विधी न्यायचे जिल्हा अध्यक्ष ऍड. रवी वाढई, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष मोईन रहमान शेख, सतीश तुरकर, तोपलाल रहांगडाले, पुरुषोत्तम टेभरे, युवासेना जिल्हा अध्यक्ष मुकेश थोटे, मयूर लांजेवार, संदीप सार्वे, रतन झिंगरे, प्रमोद मेश्राम, राजू परशुरामकर, अण्णा सोनकुसरे, सुरेश गजापुरे, कृपाशंकर डहरवाल, योगेश सोनकुसरे, सुरेश दुर्गे, रामचंद्र रामटेके, राहुल मेश्राम, अजय मते, गणेश खेडीकर, राहुल बांते, प्रतीक दिघोरे, सुभाष मते, कैलास मोटघरे, शरद दिघोरे, किशोर वाघाये, दीपक सोनवणे, शशिकांत भोयर, रंजित निबारते, सुधीर लोहबरे, नंदू पडोळे सह अनेक शिवसैनिक व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करुन मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके उपस्थित होत्या. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, काँग्रेसच्या काळात एकदा घोषणा झाली की, शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी मिळायची, मात्र राज्यातील फडणवीस सरकारला जास्त अक्कल असल्याने कर्जमुक्ती मिळत नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले की, रब्बी हंगामासाठी शेतक-यांना बॅंकांनी कर्जे उपलब्ध करून दिली पाहिजेत. सरकारने याकडे लक्ष देऊन शेतक-यांचा त्रास कमी करावा. रावते यांनी पक्षाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नव्याने भेट घेऊन त्यांना कळविली आहे.
वाशिममध्ये शिवसेनेत फाटाफूट
शिवसेनेने राज्यभरात कर्जमुक्ती मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र मागणी एक आणि मोर्चे दोन हे चित्र वाशिममध्ये पाहायला मिळालं. वाशिममध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.मात्र, त्याच मोर्चाच्या अगदी काही अंतरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा दुसरा मोर्चा निघाल्याने सेनेतील गटबाजी आता किती चव्हाट्यावर आली आहे हे यावरून दिसून येते.
चंद्रपुरात धरणे आंदोलन
सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही नवरात्रीच्यापूर्वी देण्यात यावी, या मागणीसाठी आज चंद्रपुरात शिवसेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.सरकारने कर्जमाफीची केवळ घोषणा केली, मात्र अजून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असूनही अजून हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म भरुन झालेले नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी अजून किती काळ लांबणार, असा सवाल करत दसऱ्यापूर्वी कर्जमाफी द्यावीर अशी मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे.
सोलापूर- शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्जमाफीची अमंलबजावणी तातडीने करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. दसऱ्यापूर्वी कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आग्रही आहेत. कर्जमाफीच्या नावावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
औरंगाबाद –“कर्जमाफीच्या घोषणेला तीन महिने झाले, तरीही अटी आणि शर्थीतच कर्जमाफी अडकली आहे. दसऱ्यापूर्वी कर्जमाफीची पूर्तता करा. अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसेनेच्यावतीने औरंगाबादच्या विभागीय आयुक्त् कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते,नेते आणि शेतकरी सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेताना अडचणी आल्या, तरीही या अडचणीत शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने फॉर्म भरले. आता सरकारकडून तारखांवर तारखा दिल्या जात असल्याने, कर्जमाफी कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. म्हणून दसऱ्यापूर्वी ही कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.