आर्वी ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो ओढा!

0
23
परभणी : तालुक्यातील आर्वी ते पेडगाव  या रस्त्याचा प्रश्न मागील चार, पाच वर्षापासून कायम आहे. पावसाळ्यात शेतकरी, ग्रामस्थांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागतो. नुकत्याच झालेल्या पावसानमुळे रस्त्याचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला असून, ग्रामस्थांनी किमान रस्ता मजतबुतीकरण करण्याची मागणी केली आहे.
परभणी तालुक्यातील आर्वी हे मोठी लोकसंख्या असलेले गाव आहे. बहूतांश ग्रामस्थांचा व्यवसाय शेती आहे. मात्र अद्यापही या गावाला मजबुत असा रस्ता नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना बाजारपेठ (Market) गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माजी आ. मोहन फड यांनी ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन रस्त्याचे काम होती घेतले होते. मागील चार, पाच वर्षात पेडगाव शिवारातील चार किती रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे, मात्र उर्वरित चार ते पाच किमी अर्वी शिवारातील काम जैसे थे आहे. पावसाळ्यात ये-जा करण्यास रस्ताच नाही. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते. पावसाळ्यात साथीजन्य आजार किंवा एखादा रुग्ण आजारी पडला, तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात महिला, पुरुषांना ओढ्यातून मार्ग काढावा लागतो. ओढ्याच्या दोन्ही टोकाला दोरी बांधलेली दोरी धरुन महिला, पुरुषांना गाव जवळ करावे लागते. सध्या खरिप हंगामाची (Kharip Season) तयारी सुरु आहे. शेतीची कामे सुरु झाली आहेत. मात्र चिखल रस्ता तुटवत शेती साहित्य व औजारे घेऊन जात नाही. स्थानिक ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून रस्ता दुरुस्तीची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
परभणी तालुक्यातील आर्वी ग्रामस्थ (Arvi Villager), शेतकर्‍यांना मुख्य बाजारपेठेशी जोडणारा रस्ता पावसाळ्यात बंद पडतो. रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत,मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आर्वी-झरी मार्गे मांडवा रस्ता झाल्यास शेतकर्‍यांना मानवत बाजारपेठ जवळ पडते. त्यामुळे शासनाने (Government) या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे.