नवी दिल्ली-गेल्या अनेक दिवसांपासून बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरु होता. या संघर्षाला शुक्रवारी अखेर पूर्णविराम मिळाला. त्यानंतर आज जदयू नेता नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी राजभवन येथे नितीश आणि त्यांच्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला नुकताचं राजीनामा दिलेले जितनराम मांझी, ममता बॅनर्जी, तरुण गोगोई आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या शपथविधीनंतर भाजप नेता शाहनवाज हुसैन यांनी जंगल राज सुरुच राहणार असल्याची टीका केली आहे.