*जिल्हाधिकाऱ्यांचे लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 7 : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेतजमिन सुपीक करणे आणि धरणातील पाणीसाठा वाढवणे, यासाठी उपयुक्त असल्याने शासनस्तरावर जाणीवपूर्वक राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
चांदुररेल्वे तालुक्यातील सोनगाव आणि शिवणी येथे सुरू असलेल्या कामांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार पुजा माटोडे, पाटबंधारे उपविभागीय अभियंता पी. जी. दातीर, प्रकल्प अभियंता वसंतराव पांडव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अमोल आमले, प्रवीण गावंडे, दिनेश आमले, प्रशांत शिरफाते, तलाठी श्री. नादणे, विजय येडे, गजानन राऊत, प्रमोद राऊत, हर्षल वानखडे, आषिश गावंडे, श्री. लव्हाळे, किशोर बैशवार, निलेश सौसाकडे, अक्षय जामदार, अक्षय भेंडे, अक्षय फत्तेपूरे आदी उपस्थित होते
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज चिरोडी, ता. चांदुर रेल्वे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चिरोडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. चांदुररेल्वे गटसाधना केंद्र येथील पिपल्स कला मंचच्या नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच चांदुर रेल्वे तहसील कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची कामाचा आढावा घेतला.

जिल्हा परिषदेंतर्गत अंबापूर, ता. चांदुररेल्वे येथील जलयुक्त शिवारच्या कामास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर निंभा, ता. चांदुररेल्वे येथील विठाई चॅरिटेबल ट्रस्टच्च्या आरओ प्लॉन्टचे उद्घाटन केले. तसेच नदी पुनर्जीवन अंतर्गत तयार केलेल्या पुलाचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले. शेंदूरजना खुर्द येथील सिमेंट नाला बांधकामाची पाहणी केली.
श्री. कटियार यांनी तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे सर्व विभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच धामणगाव रेल्वे येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाना शिधा पत्रिका वाटप, तसेच कोलाम समाजातील लोकांना गोल्डन कार्ड व जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर, ता. धामणगाव रेल्वे येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची कामाची पाहणी केली. तसेच चिंचपूर ता. धामणगाव रेल्वे येथील जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण कामाची पाहणी करण्यात आली.

