Home राजकीय राज्यातील जनतेची भाजपकडून 1600 कोटींची ‘पाकीटमारी’- उद्धव ठाकरे

राज्यातील जनतेची भाजपकडून 1600 कोटींची ‘पाकीटमारी’- उद्धव ठाकरे

0

मुंबई दि.२: दुष्काळकर आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनामधून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करीत बोचरी टीका केली आहे. अर्थमंत्र्यांनी 1600 कोटी रुपयांच्या कराचा बोजा लादून, दुष्काळ निवारणासाठी पाकीटमारी केली आहे. त्यांच्या या हिमतीला दाद द्यावीच लागेल, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. हे सर्व करून घेण्यासाठी राज्याला व देशाला अर्थमंत्र्याची खरेच गरज आहे काय? असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेने भाजप सरकारवर करवाढीच्या निर्णयावरून टीका केली आहे.दरम्यान, दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या नजरा पंतप्रधान मोदींकडे लागून राहिल्या आहेत. आक्रोश करणार्‍या महाराष्ट्राकडे मोदींची कृपादृष्टी वळेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही, असा आशावादही शिवसेनेने सामनातून व्यक्त केला आहे.

Exit mobile version