Home राजकीय अडवाणींच्या नेतृत्वातही पराभव झालाच होता की!

अडवाणींच्या नेतृत्वातही पराभव झालाच होता की!

0

नागपूर ,दि. १२ –  बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला. या बुजुर्गांवर थेट पलटवार करताना त्यांनी पक्षातील परंपरा आणि अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांमधील पराभवाचे स्मरण करून दिले. इतकेच नव्हे, तर मोदी आणि शहा यांच्या विरोधात बेजबाबदार जाहीर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची जाहीर भूमिका गडकरी यांनी घेतली.

बिहारमध्ये भाजपाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पक्षात मतभेदांचे फटाके जोरात वाजू लागले आहेत. ही फटाकेबाजी अजून थांबलेली नाही. मंगळवारीच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा

आणि शांताकुमार यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर गडकरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

Exit mobile version