Home राजकीय अखेर राजकीय मानापमान नाटकामुळे भूमिपूजन सोहळा रद्द

अखेर राजकीय मानापमान नाटकामुळे भूमिपूजन सोहळा रद्द

0

अर्जुनी मोर.दि. ७- आज (७मे) तालुक्यातील इसापूर येथे आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना भूमिपूजनाचा कार्यक्रम राजकीय मानापमान नाटकामुळे हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला.

या कार्यक्रमाचे बॅनर सुद्धा दोन दिवसाआधी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले त्यामध्ये या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले, तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ पौर्णिमा ढेंगे हे राहणार होते. विशेष अतिथी म्हणून अर्जुनी मोर पंचायत समिती सभापती सविता कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम, ईसापुर ग्रामपंचायत सरपंच  कल्पना करंबे, उपसरपंच ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये या नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडणार होता. मात्र, ऐनवेळी भूमिपूजन कार्यक्रमाला बोलाविलेल्या पाहुण्यांच्या नावांमुळे घोळ होऊन अखेर हा भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला.

Exit mobile version