
मुंबई,दि.०५– विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी देशाचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भारत पाक नाते संबंधान्ना संविधानिक व कायद्याच्या चौकटीत बसवण्याची विनंती वजा मागणी केली आहे.
मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. माकणीकर यांनी पत्रात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीत लाखो कुटुंबांचे तुकडे झाले. काही लोक भारतात राहिले, तर काहींचे नातेवाईक पाकिस्तानात स्थायिक झाले. ही वेदना कुणी सारण्याजोगी नाही हे खरे. पण आज ७५ वर्षांनंतरही काही घटक भारतात राहून पाकिस्तानप्रेम उरात बाळगतात, ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत चिंताजनक ठरते.
भारत पाक जर युद्ध उद्भवले, तर अंतर्गत गद्दारीचा धोका नाकारता येईल का?
भारत-पाकिस्तानमधील तणाव सततचा आहे. सीमारेषेवर शत्रूचा गोळीबार सुरू असतानाच देशांतर्गत काही लोक पाकिस्तानच्या बाजूने बोलताना दिसतात. सोशल मीडियावर खुले समर्थन, पाकिस्तानी झेंडे, गाणी, आणि व्हिडीओ याचा प्रसार हा राष्ट्रद्रोहाच्या सीमारेषेवरच आहे.या भावनिक नातेसंबंधाच्या आड देशद्रोहाला खतपाणी मिळत आहे, ही बाब गंभीर आहे.यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष देण्यासाठी डॉ. माकणीकर यानी काही सूचना केल्या आहेत:
1. युद्ध काळात माहिती फोडली जाण्याचा धोका.
2. अंतर्गत सामाजिक संघर्ष, दंगली आणि विद्वेषाचे वातावरण.
3. धार्मिक व भावनिक आधारावर राष्ट्रविरोधी मानसिकता.
4. देशातच पाकिस्तानसाठी ‘स्लीपर सेल्स’ कार्यरत होण्याची शक्यता.
म्हणून गरज आहे संविधानिक आणि कायदेशीर चौकटीची – यासाठी डॉ. माकणीकर यांनी काही ठोस सूचना प्रस्तावीत केल्या आहेत:
1. पाकिस्तानमधील नातेवाईक असणाऱ्या भारतातील नागरिकांची सूची तयार करणे.
2. त्यांच्यावर विशेष नजरेखाली गुप्तचर यंत्रणेद्वारे निरीक्षण ठेवणे.
3. विदेशी नातेसंबंधांच्या घोषणेसंदर्भात कायदेशीर सक्ती व पारदर्शक नोंदणी प्रक्रिया.
4. देशद्रोही वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी विशेष कायदा.
5. भारत सरकारकडून “राष्ट्रीय निष्ठा व मूल्यशिक्षण” देणारी मोहिम शाळा व महाविद्यालयांमधून राबवणे.
हे संविधानाच्या चौकटीत बसत, नव्हे असं नाही. भारतातील कलम 19 (1)(a) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क देते, पण त्याचवेळी कलम 19 (2) नुसार राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या निर्बंधांची मुभा सुद्धा सरकारला आहे.
सर्वोच्च न्यायालयही म्हणते – “राष्ट्रहित सर्वोपरि आहे.”
“देशभक्ती ही भावना नसून जबाबदारी आहे!”भारतात राहून, भारतीय संसाधने उपभोगून पाकिस्तानचा जयघोष करणे ही केवळ भावनिक चूक नाही, तर ती देशाच्या एकतेला खिळा ठरणारी कृती आहे. त्यामुळेच अशा नातेसंबंधांवर कायदेशीर चौकट घालणे आता काळाची गरज बनली आहे.
डॉ. राजन माकणीकर यांची स्पष्ट व ठाम भूमिका:
“फाळणीच्या वेदना आम्ही समजून घेतो. पण आज भारतात राहून जर कुणी पाकप्रेमाच्या नावाखाली राष्ट्रद्रोह करणार असेल, तर त्याला कायद्याच्या चौकटीत अटकाव करणे हेच खरं देशप्रेम!”या विषयावर जनतेनेही आवाज उठवावा, अशी डॉ. माकणीकर यांची आवाहनात्मक मागणी आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे “प्रथम आणी अंतिम केवळ भारतीय. ” यामुळेच “राष्ट्र सर्वप्रथम!” – हे आपले एकत्रित ब्रीदवाक्य असायला हवे. असे डॉ. माकणीकर म्हणतात.