Home राजकीय नोटाबंदीमुळे जनता त्रस्त – शरद पवार यांची मोदींवर टीका

नोटाबंदीमुळे जनता त्रस्त – शरद पवार यांची मोदींवर टीका

0
मुंबई, दि. 20 – चलनातून 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे काही दिवसांपूर्वी स्वागत करणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या निर्णयावर सडकून टीका केली आहे. मोदींच्या या निर्णयामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तर काळा पैसावाले मस्त मजेत आहेत. असे टीकास्त्र शरद पवार यांनी सोडले.
मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी   मुंबई महानगरपालिकेत सत्तापरिवर्तन करण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 500 आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर पवार यांनी जोरदार ताशेरे ओढले. “आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे काही सुरू आहे, ते जर असेच सुरु राहिले, तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. मोदींच्या निर्णयामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तर काळापैसावाले मस्त आहेत,”असा टोला पवार यांनी लगावला.

Exit mobile version