Home Top News वाजपेयींना मिळणार ‘भारतरत्न’?भाजप खासदारांची मागणी

वाजपेयींना मिळणार ‘भारतरत्न’?भाजप खासदारांची मागणी

0

नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मिळण्याची शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्‍यात यावे, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे मंगळवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही मागणी मान्य केल्यास येत्या 26 जानेवारी प्रजासत्तक दिनी ‘भारतरत्न’ने वाजपेयींचा सन्मानित करण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस, बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सैनिक मदन मोहन मालवीय यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची मागणी यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारकडे झाली होती.
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला पाच ‘भारतरत्न’ पदके बनविण्याचे सांगितले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदकांची मागणी केल्यामुळे यंदा एका पेक्षा अधिक व्यक्तिंना सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, असेही नाही की पाच व्यक्तिनांच सन्मानित केले जाईल.

सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेला पाच भारतरत्न पदक बनविण्याचे सांगितले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदकांची मागणी केल्यामुळे यंदा एका पेक्षा अधिक व्यक्तिंना सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, असेही नाही की पाच व्यक्तिनांच सन्मानित केले जाईल.
सध्याच्या कायद्यानुसार, एकावेळी जास्तीत जास्त तीन व्यक्तिंना भारतरत्नने सन्मानित केले जाऊ शकते. जर मोदी सरकारला तीन पेक्षा अधिक व्यक्तिंना सन्मानित करायचे असेल तर, नियमांमध्ये बदल करावे लागतील. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक प्रकारे संदेश देऊ इच्छितात त्यांच्याआधीच्या यूपीए सरकारने ज्या दिग्गजांचे कार्य नजरेआड केले त्यांचा मोदी सरकारने सन्मान केला आहे.
गेल्या वर्षी यूपीए सरकारने सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीएनआर राव यांना भारतरत्नने सन्मानित केले होते. आता पर्यंत 43 जणांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यातील 11 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला. पहिला भारतरत्न पुरस्कार सी. गोपालचारी यांना देण्यात आला होता. खान अब्दुल गफ्फार खान आणि नेल्सन मंडेला यांचाही भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने गौरक करण्यात आला होता.

Exit mobile version