वृत्तसंस्था
कोलकत्ता – बंगालच्या खाडीत एक भारतीय बोट बुडाली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, दोघांना वाचवण्यास तटरक्षक जवानांना यश आले आहे. ही दुर्घटना आज (रविवार) दुपारी सुंदरबनच्या हिरो प्वाइंटपासून 30 किमी अंतरावर घडली.शोधकार्यासाठी बंगलादेशाने जवान पाठवून सहकार्य केले. बांगलादेशातील कोस्टगार्डच्या मोंगला झोनचे प्रमुख कॅप्टन मेहंदी मसूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय बोटी समुद्रात होत्या. मात्र, वातावरण खराब झाल्याने एक बोट बुडली.याची माहिती मिळताच आम्ही तत्काळ बाचवकार्य सुरू केले. यात पाच जणांचे मृतदेह हाती लागले तर दोघांना वाचवण्यात यश आले. अजूनही 10 जण बेपत्ता आहेत.भारतानेही शोधकार्यासाठी बंगलादेशात नेवल शिप आणि पेट्रोलिंग एयरक्राफ्ट पाठवले आहे.