Home Top News जय ची हत्या? संशयीत दोघे एसआयटीच्या ताब्यात

जय ची हत्या? संशयीत दोघे एसआयटीच्या ताब्यात

0

गोंदिया,दि.16-उमरेड कर्हांडला व्याघ्रप्रकल्पातील पर्यटकानाच नव्हे तर देश विदेशातील पर्यटकांना भूरळ घालणारा जय हा वाघ गेल्या अनेक महिन्यापासून बेपत्ता होता.त्याच्या शोधासाठी वनविभागाच्या एसआय़टीसह राज्यसरकारने सीबीआयची विशेष चमू नेमली होती.या चमूच्या तपासात लागलेल्या काही पुराव्यानुसार जय वाघाची हत्या झाल्याची शंका असून या जय वाघाच्या हत्येप्रकरणी पवनी तालुक्यातील कोदुर्लीतील किसन ईस्तारी समर्थ व मधुकर मुरलीधर हटवार या दोघांना आज 16 आॅगस्ट रोजी साय 6 वाजेच्या सुमारास सर्च वांरट काढून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई वनविभागाच्या नागपुरातील एसआयटी चमूने केल्याचे सुत्रांचे म्हणने आहे.या संदर्भात वनविभागाच्या तपास पथकाने अद्याप काहीही सांगितलेले नाही.त्यामुळे जय ची ह्त्या झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version