
अमरावती- अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असणाऱ्या मेळघाटातील काही भागात बुधवारी रात्री 9.58 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. धारणी तालुक्यात येणारं शिवाझरी हे गाव भूकंपाचं मुख्य केंद्रबिंदू होतं, या भूकंपाची तीव्रता 3.8 रिस्टर स्केल इतकी असल्याची नोंद राष्ट्रीय भूविज्ञान केंद्रानं नोंदविली.
भूकंपाचा हा धक्का सौम्य स्वरूपाचा होता. मात्र या धक्क्यामुळं शंभराच्या आसपास घरांची संख्या असणाऱ्या शिवाझरी गावात खळबळ उडाली. शिवाझरीलगत सुसर्दा, डाबला, राणीगाव, नारदू या गावातदेखील सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भाटकर यांनी सांगितले.