
गोंदिया(खेमेंद्र कटरे)- एक वन अधिकारी व वन्य पशुपक्षी अभ्यासक असल्यामुळे त्यांनी नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली.आपल्या पदाला कर्तव्य म्हणून त्यांनी न्याय दिला असे पद्मश्री अरण्यऋषी मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे आज बुधवारी सायं ७.५०वा वयाच्या ९४ व्या वर्षी देहावसान झाले आहे.अक्कलकोट रोडवरील ,सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि.१९जून रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार होणार आहे,त्यांच्या मागे भावजय,दोन पुतणे,सुना व नातवंडे असा परिवार आहे.30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते आजारी आणि अंथरुणातचं होते.

मारुती चित्तमपल्ली जवळचे आणि घरातील कुटुंबासारखे माधवराव पाटील यांचे सदस्य होते.नवेगावबांधला नोकरीवर रुजु झाले तेव्हा माधवराव पाटीलडोंगरवार यांच्याबद्दल माहिती मिळताच त्यांच्या भेटीला आले त्याच्या भेटीनंतर व पुस्तक वाचनानंतर माधवराव पाटलांचे शिष्य केले.आदिवासी लोकांच्या माध्यमातूनच त्यांनी जंगल वाचवले त्यांच्या सोबतीनेच विकास केला.१९७३ पासून सलग सहा वर्ष येथे होते.आदिवासीकडे परवाना नसलेल्या बंदुका होत्या त्यांचाने ते शिकार करायचे.अशातच त्यांनी त्या आदिवासींना जगंल व प्राण्याप्रती जागृत केल्यानंतर आदिवासी नागरिकांनी आपल्याकडी ३६ बंदुका मारुती चित्तमपल्लीकडे सोपविल्या.परंतु चितमपल्ली साहेबांना त्या बंदुका जप्त करतांना त्या गोर गरीब आदिवासींचेही रक्षण करीत जंगलात या बंदुका सापडल्याचे नमुद करुन त्यांच्यावर दाखल होणार्या गुन्ह्यापासून त्यांचा बचाव केला होता.तर दुसरीकडे जंगलातील लाकडे ही घराकरीता व लग्नकार्यक्रम असो की इतर कार्यक्रमाकरीता मात्र नेण्याची मुभा देतांनाच रक्षणाचीही हमी घेतली होती. त्यांना या नवेगावबांधच्या जंगलाची माहिती व रस्ते दाखविण्यासोबतच त्यांच्या सोबतीला नेहमी राहणारे आदिवासी समाजातील माधव,सदा,निरगु,भिवाढिवर झोलबा हे सर्व त्यांच्या आय़ुष्यात महत्वाचे ठरले. त्यांच्याकडूनच जंगलाची माहिती घेतली यांच्याबद्दल त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.पक्षी व प्राण्याकरीता नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती नेहमीच अविस्मरणीय आठवणीत राहणारी आहे.