Home Top News ४ तासात ३५ दहशतवादी, ९ पाकी सैनिकांचा खात्मा

४ तासात ३५ दहशतवादी, ९ पाकी सैनिकांचा खात्मा

0

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. २९ –  भारतीय लष्कराने बुधवारी रात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर हल्ले केले. सुमारे ४ तास चाललेल्या या कारवाईत पाकिस्तान लष्कराच्या नऊ सैनिकांसह किमान ३५ दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली.
गुप्तचरांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी लष्करालाही या कारवाईची माहिती दिल्याचे भारतीय लष्कराच्या डीजीएमओंनी सांगितले. हे दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याच्या तयारीत होते. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणा-यांच्या विरोधात हे हल्ले होते अशी माहिती लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली. आता ही कारवाई संपली असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version