
खेमेंद्र कटरे
गोंदिया :दि.21-: शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौकातील होटल qबदल प्लाझामध्ये गेल्यावर्षी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता घडलेल्या अग्नीकांडाला एकवर्ष होत चालला आहे.या अग्निकांडात निष्पाप ७ जणांचा जीव गेला.ज्या हॉटेलमालकाच्या चुकांमुळे निष्पापांचा जीव गेला ते मात्र न्यायालयातून जामीन घेऊन आज मोकाट बाहेर फिरत आहेत.नव्हे तर पुन्हा त्या ठिकाणीच नव्याने हॉटेल सुरू करण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.या घटनेला १ वर्ष होत असल्याने त्या घटनेतील निष्पाप जीव गेलेल्या ७ जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोंदियातील सोशलमिडियात सर्वाधिक चर्चेत राहणाèया गोंदिया विधानसभा या व्हाटसअॅप ग्रुपने गुरुवार २१ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यानिमित्ताने पुन्हा या घटनेचा आढावा घेतला असता पोलिस प्रशासनासह नगरपरिषद व जिल्हाप्रशानाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईनुसार सदर प्रकरणात ५ जणांविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल झालेले आहे.पण ज्या निष्पापांचे जीव गेले त्यापैकी कुणालाही अद्यापही शासकीय मदत मात्र मिळालेली नाही.७ पैकी फक्त १ व्यक्तीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री निधीतून १ लाख रुपयाचा धनादेश गोंदिया जिल्हाप्रशासनाने नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला.मात्र उर्वरित ६ जणांच्या कुटुंबांना अद्यापही कुठलीच मदत मिळालेली नाही.त्यातही विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोेले यांनी घटनेच्या दिवशीच सायकांळी मृतकाच्या कुटुंबीयांपैकी अजमेरा कुटुंबीयांची भेट घेत मुख्यमंत्री निधीतून २ लाख रुपयाची मदत देण्याची घोषणा केली होती.ती घोषणा फक्त घोषणाच ठरली असून पालकमंत्रीही त्या गोष्टीला विसरले असावेत यात शंकाच राहिली नाही.
या अग्नीकांडात मृत झालेल्यांमध्ये मध्यप्रदेशातील महू येथील सुरेंद्र हिरालाल सोनी व इंदोर येथील रवींद्र मानqसग जैन हे गोंदियातील अजमेरा कुटुंबीयांचे जावई होते. सांगली जिल्ह्यातील घोगावचे अभिजित विश्वास पाटील, नागपूरचे प्रवीण शरद देशकर व प्रेमकुमार संतोष साबू, वरोराचे आदित्य अशोक कुराडे,बिलासपूर येथील अर्जित रमेशचंद्र दीक्षित यांचा समावेश होता.
घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य व गोंदियातील जनता बँकेचे अध्यक्ष असलेले डॉ.राध्येशाम अग्रवाल हे qबदल प्लाझामधील थाटबाटचे संचालक होते.तर त्यांचा मुलगा आशिष अग्रवाल हॉटेल qबदल प्लाझाचा संचालक होता.पोलिसांनी त्यांच्यासह रायपूर निवासी सुरेंद्र बनसोड,लोकेशपुरी वैकुंटी व विश्वजित खोब्रागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.परंतु डिसेंबरमध्ये घडलेल्या या घटनेतील हे अभियुक्त पोलिसांना सापडतच नव्हते.तर विशेष म्हणजे यासर्वांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना अटकपूर्व जामीन दिल्यामुळे गोंदिया पोलिसांनी २ मे २०१७ रोजी नाममात्र अटक करून जामिनावर सोडले.७ जणांचा निष्पाप जीव गेल्यानंतरही राज्यातील सरकारने या अग्रवाल यांना संपूर्ण राजकीय संरक्षण दिल्याचे स्पष्ट दिसून येते.वास्तविक होटल qबदल प्लाझा आगीमुळे एवढी जळीत झालेली आहे की ही ईमारत धोकादायक स्थितीत असताना पुन्हा त्या इमारतीमध्ये हॉटेल सुरू करण्याचे फलक लावण्यात आले आहे.परंतु कुठलीच ठोस कारवाई त्यांच्यावर प्रशासनातर्फे होऊ शकली नाही.
पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये ४ फुटलेले व १८ रिकामे सिqलडर qबदल प्लाझामध्ये तर दोन सिqलडर झी महासेलमधून जप्त करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.सोबतच बांधकामासाठी सादर केलेल्या नकाशामध्ये दुसèया व तिसèया माळ्यावर ६ खोल्या दर्शविलेल्या असताना पंचनाम्याच्यावेळी ९ खोल्या आढळल्याचे तसेच कान्फरंस हॉलच्या ठिकाणी झी महासेल असल्याचे म्हटले आहे.अहवालात आग विझविण्यासाठी कुठलेही यंत्र इमारतीमध्ये नसल्याचे,लिफ्ट लावण्याची अधिकृत परवानगी नाही.व्हेटिलेशनची सोय कुठेच इमारतीमध्ये नसल्याचा उल्लेख दोषारोप पत्रात केला गेला आहे.या अग्निकांडाच्या तपासादरम्यान तब्बल ५२ लोकांचे साक्ष नोंदविण्यात आले आहेत.विशेष म्हणजे हॉटेल व थाटबाटच्या परवान्याचे नूतनीकरण न करताच व्यवसाय बिनभोबाट सुरू ठेवलेला होता.तर इमारतीचा फायर ऑडिट सुद्धा करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.चौकशीदरम्यान तर हॉटेलमधील गेस्ट एंट्री रजिस्टरची पाने सुद्धा फाडण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. होटल qबदल प्लाझाच्या संचालकांना ३ ऑगस्ट २०१३ मध्येच फायर ऑडिटसाठी पत्र दिले होते,परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले.हॉटेलमध्ये १२ अग्निशमन यंत्रासह पाइपलाइनची व्यवस्था हवी होती.परंतु फक्त ४ अग्निशमन यंत्र आढळून आले.
हॉटेलच्या आगीत सात जणांचा बळी घेतलेल्या या बिंदल प्लाझाची पुन्हा रंगरंगोटी सुरू झाल्याने हॉटेल सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे अग्नितांडव २१ डिसेंबर २०१६ रोजी पहिलेच गोरेलाल चौकातील बिंदल प्लाझामध्ये घडले,ते सुद्धा हॉटेल व्यवस्थापनाच्या चुकीने हे नगरपरिषद व अग्निशमन विभागानुसार.सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे,ज्यापध्दतीने इमारतीला आग लागली,त्यावरून ती इमारत वापरण्यायोग्य होऊच शकत नाही.परंतु त्या इमारतीच्या सुरू असलेल्या रंगरगोंटीवरुन असे दिसून येते की ज्या सात निष्पाप लोंकाचा नाहक जीव गेला त्यांच्या बद्दल त्या हॉटेल मालकालाच नव्हे तर त्यांना साथ देणाèया गोंदियातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना काहीच कसे वाटत नाही,हे कळेनासे झाले आहे.
घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांत्वन करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये प्रत्येकी तात्पुरती मदतीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप मृतांच्या कुटुंबियांपर्यंत मदतनिधी पोहोचली नाही. या आगीत हॉटेलचे चार मजले जळून खाक झाले.
विशेष म्हणजे महासेल फक्त काही दिवसापुरता असते परंतु हा महासेल गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असताना कामगार आयुक्त कार्यालय व नगपरिषेदचे दुर्लक्ष झाले होते. ज्या होटलला आग लागली त्या होटलचे सुद्धा वरचे काही बांधकाम अनधिकृत असल्याची बाब नंतर उजेडात आली. त्या बांधकामाला नगरपरिषदेसह इतर कुठल्याही विभागाचे परवानगी नाही. हॉटेल आणि लॉज सुरू करण्याकरिता कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा निर्वाळा खुद्द पालिका प्रशासनाने दिला.या सर्व प्रकरणाचा विचार करता ज्या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले,त्यासोबत गोंदिया नगरपरिषद व गोंदिया तहसील,उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील काहींवर सुद्धा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवे होते.कारण त्यांनी एवढे दिवस या हॉटेलच्या परवान्यापासून इतरबाबीकडे दुर्लक्ष का केले.
वाटत नाही,हे कळेनासे झाले आहे.
घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांत्वन करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये प्रत्येकी तात्पुरती मदतीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप मृतांच्या कुटुंबियांपर्यंत मदतनिधी पोहोचली नाही. या आगीत हॉटेलचे चार मजले जळून खाक झाले. विशेष म्हणजे महासेल फक्त काही दिवसापुरता असते परंतु हा महासेल गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असताना कामगार आयुक्त कार्यालय व नगपरिषेदचे दुर्लक्ष झाले होते.
ज्या होटलला आग लागली त्या होटलचे सुध्दा वरचे काही बांधकाम अनधिकृत असल्याची बाब नंतर उजेडात आली. त्या बांधकामाला नगरपरिषदेसह इतर कुठल्याही विभागाचे परवानगी नाही. हॉटेल आणि लॉज सुरू करण्याकरिता कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचा निर्वाळा खुद्द पालिका प्रशासनाने दिला.या सर्व प्रकरणाचा विचार करता ज्या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले,त्यासोबत गोंदिया नगरपरिषद व गोंदिया तहसिल,उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील काहींवर सुध्दा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवे होते.कारण त्यांनी एवढे दिवस या हाटेलच्या परवान्यापासून इतरबाबीकडे दुर्लक्ष का केले.