Home Top News ओबीसी संघर्ष कृती समितीचा चक्का जाम: केंद्रसरकारच्या नोंदविला निषेध

ओबीसी संघर्ष कृती समितीचा चक्का जाम: केंद्रसरकारच्या नोंदविला निषेध

0
चक्काजाम करून केंद्र शासनाच्या आरक्षण नीतीचा विरोध
ओबीसी संघटनेच्या राज्यातील पहिलाच रास्ता रोको आंदोलन
गोंदिया,दि.25ः- : मंडल आयोगावरील सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाचा निकाल डावलून ओबीसींचे २७ टक्के असलले आरक्षण वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी केंद्रीय कोट्यात केवळ २ टक्के एवढे करून ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय  प्रवेशापासून केंद्र सरकारने वंचित केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोधात गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व बहुजन एकता मंचसह सर्व ओबीसी समाज संघटानानी निषेध नोंदवित आज (दि.२५) स्थानिक जयस्तंभ चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करून चक्काजाम आंदोलन केले.ओबीसी सघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा एैनवेळेवर करण्यात आल्याने बंदोबस्तासाठी नसलेल्या पोलीस प्रशासनाची चांगलीच ताराबंळ उडाली.संघटनेच्या महिला पुरुषासह युवक पदाधिकारी यांनी जयस्तंभं चौकातील चारही बाजूने रस्त्यांना घेराव घालून आंदोलन केले.सुमारे अर्धातास चाललेल्या या आंदोलनामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था चांगलीच खोळबंली गेली.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपर्यंत ओबीसी संघटनानी निवेदने देऊन धरणे आंदोलन केली.मात्र रास्तारोकोसारखे आंदोलन केली नव्हती यावेळी मात्र गोंदियाच्या ओबीसी संघर्ष कृती समितीने सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यासाठी आक्रमक होत रास्तारोको आंदोलन केले,हे आंदोलन ओबीसी संघटनेच्यावतीने केलेले पहिलेच आंदोलन ठरले आहे.त्यातच यापुढे नागपूरात सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्याा पुर्वी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदाराच्या निवासस्थानी सुध्दा आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघटनेच्या कारकिर्दिला उद्या 26 जून रोजी दोन दशक पुर्ण होत आहेत.26 जून 1998 रोजी जिल्ह्याती गोरेगाव येथे ओबीसी संघटनेची स्थापना करण्यात आली होती.त्यासंघटनेच्या दोनदशक काळाच्या पुर्वसंध्येला ओबीसी संघटनेने केलेले हे आंदोलन या जिल्ह्यातील ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.चक्काजामनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.
विशेष म्हणजे, संघटनांच्या वतीने राज्यातील पहिलेच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यापूर्वी निवेदन अथवा धरणेच्या माध्यमातूनच हे आंदोलन करण्यात येत असे.ओबीसीनी हे आंदोलन शातंतेत केल्याने या आंदोलनाबद्दल शहरातही कौतुक केले जात होते.कुठलेही तोडफोड नाही किंवा हाणामारी नाही त्यातच अनेक व्यवसायकिंनी ओबीसी आत्ता जागे झाले त्यांच्यावर झाले असून अन्यायाच्या विरोधात अधिक लढाई त्रीव होणार अशा प्रतिक्रिया होत्या.पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे यांच्या चमूनेही आंदोलकांची भूमिका समजून घेत त्यांना सहकार्य केले.तर आंदोलकानीही पोलिसांना सहकार्य केले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय आरक्षणानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी १५ टक्के आरक्षण ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्र शासनाच्या वतीने हे आरक्षण २ टक्क्यावर आणण्यात आले आहे. तसेच ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित खुल्या प्रवर्गांकडे वळविलेल्या आहेत. एस.सी. प्रवर्गासाठी १५ व एस.टी. साठी ७ टक्के जागा आरक्षित करून ७६ टक्के जागा केवळ खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या आहेत. यातही राज्यातील २१ शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालय तसेच केंद्र शासनाच्या यादीमधील १७७ महाविद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आरक्षणच ठेवले नाही. त्यामुळे विज्ञान विषयात चांगले गुण घेवून बारावीची परीक्षा पास केलेल्या व सीईटीमध्ये उत्तम गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार केंद्र शासनाने सुरू केल्याच्या निषेधार्थ आज धरणे आंदोलनासह चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौक येथील ओबीसी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात झाली. उपस्थित बांधवांनी वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणाच्या मुद्यावरून शासनाला चांगलेच धारेवर धरले. आंदोलनानंतर जयस्तंभ चौक येथील चहू बाजूचे रस्ते रोकून तासभर आंदोलन केले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाभाडे यांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे, मार्गदर्शक  आनंदराव कृपाण, प्रा.एच.एच. पारधी,खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे, राजेश नागरीकर, मनोज मेंढे, सावन डोये,प्रा.बी.एम.करमकर,सावन कटरे,लक्ष्मण नागपूरे, गौरव बिसने,  सुनिल भोंगाडे, अल्काताई कृपाण,विमल कटरे,सविता बेदरकर,पुष्पाताई खोटेले,शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे,भाकपचे हौसलाल रहांगडाले,परेश दुरुगकर,मिलिंद गणवीर, विनोद हरिणखेडे, मनोज शरणागत, डी.एस. मेश्राम, पी.डी. चव्हाण, प्रेमलाल साठवणे, रवी भांडारकर,हरिष कोहळे,दिनेश हुकरे,प्रा.काशीराम हुकरे,जितेश टेंभरे,हरिष ब्राम्हणकर,लिलाधर गिरेपुंजे,उमेंद भेलावे,सुनिल भोगाडे,रवी दखने,भोजू फुंडे,बंशीधर शहारे,नाननबाई बिसेन,धनपाल कावळे,रुपसेन बघेले,राजू ब्राम्हणकर,कमलबापू बहेकार,निलम हलमारे,राजीव ठकरेले  सुनील तरोणे,बालू गंधे,सोनू पारधी,शेरु यादव,विशाल वानखेडे,संतोष यादव,राजू रहागंडाले,नरेंद्र पदमाकर,ओमेंद्र पारधी,राजेश कापसे,अनिल मुनेश्वर,विजय मुनेश्वर,महेंद्र बिसेन,मनोड डोये,ज्योतीबा धरमशहारे,शिव नागपूरे,दिपक बहेकार  यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील महिला पुरुषबांधव सहभागी झाले होते.

Exit mobile version