
गडचिरोली- पोलिस दलात कर्तव्य करत असतांना नक्षलविरोधी कारवाईत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महामहीम राष्ट्रपती यांचेकडून पोलिस दलातील अधिकारी/ अंमलदारांना पदक जाहीर केले. भारतातील नक्षलग्रस्त जिल्ह्यापैकी एकमेव असा जिल्हा की ज्याला सर्वाधिक पदके मिळाली. गडचिरोली पोलिस दलाला मिळालेले शौर्य चक्र हे निश्चितच महाराष्ट्र पोलिस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे, असे प्रतिपादन करीत मागील २ वर्षात गडचिरोली पोलिस दलाने भरीव कामगिरी केल्याबद्दल जवानांचे कौतुक केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभपर्वावर १५ ऑगस्ट २0२२ रोजी स्वातंत्र दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातील ३ अधिकारी/अंमलदारांना शौर्य चक्र, ४२ अधिकारी/ अंमलदारांना शौर्य पदक व २ पोलिस अंमलदारांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले होते. या जाहिर झालेल्या पोलिस अधिकारी/ अंमलदारांचा १८ ऑगस्ट रोजी पोलिस मुख्यालय परिसरातील पांडू आलम सभागृहामध्ये सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार आपले कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी पदक प्राप्त जवानांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचे हस्ते पदक प्राप्त जवानांचा मोमेंटो, शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच जवानांच्या पत्नीचे साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे हे आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस मुख्यालयातील अधिकारी, विशेष अभियान पथक, सर्व अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व प्रभारी अधिकार्यांनी अथक पर्शिम घेतले