
आतापर्यंत 9 हजारांहून अधिक रोपांची लागवड
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डायऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. आपण ज्या-ज्या वेळी वाहनांचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या-त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डायऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो. आपल्या इतर छोट्यामोठ्या कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणाऱ्या वायूंची निर्मिती होत असते. दरम्यान, झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजन देत नाहीत तर आपल्याला फुले, फळे, औषधे आणि लाकूड देखील देतात. तेव्हा वृक्षारोपण करून रोपट्यांना संवर्धन करण्याचे कार्य गोंदियातील वृक्षधारा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. तर या सामाजिक कार्यात नागरिकांचाही सहभाग वाढावा स्वतः रोपटे लावण्यासाठी तयार व्हावेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही या उदात्त कार्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तरुणांनी पुढे येण्याची गरज …
आज वाढती लोकसंख्या आणि विकासाच्या नावाखाली वर्षानुवर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. तेव्हा जास्तीत जास्त झाडे लावण्याचा वृक्षधारा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. जेणेकरून आपली जमीन पूर्वीसारखी हिरवीगार दिसेल. तरुणांनी या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व स्वच्छ वातावरण मिळू शकेल आणि नागरिकांमध्येही जनजागृती होऊ शकेल.– नितेशकुमार बरेवार, सह-संस्थापक, वृक्षधारा फाऊंडेशन