
चित्रा कापसे/तिरोडा- येथील नगर परिषदेंतर्गत शहरात सुरू असलेल्या गटार पाईप लाईन (मलनि:सारण) प्रकल्पाचे काम पावसाळ्यामध्ये नागरीकांना गैरसोयीचे होऊ नये म्हणून त्वरीत थांबविण्यात यावे,याकरीता अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडाचे अध्यक्ष अब्दुल रफीक शेख, उपाध्यक्ष अशोक रहांगडाले,सचिव सुशिल भातनकर,संगठनमंत्री महादेव घरजारे,सहसचिव वाल्मीक राऊत, व ईतर कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
महत्वाचे म्हणजे मागील सहा महिन्यापासून तिरोडा शहरातील नागरीकांना रोड रस्त्याचे खोदकामामुळे अडथळे निर्माण झाले असून रहदारीस गैरसोय होत आहे.नागरीकांना होणाऱ्या गैरसुविधा त्वरीत दुर करण्याकरीता व पावसाळ्यात खोदकाम त्वरीत बंद करणे रहदारीस अळथडा निर्माण होणार नाही.याहेतूने रस्ते पुर्ववत काॅंक्रेटने पक्के करण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे.याकडे दुर्लक्ष केल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आलेला आहे.