प्राणवायू निर्मिती साठी वृक्षारोपण काळाची गरज -जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
70

*सुपलीपर येथे एक पेड माँ के नाम अभियानाची सुरुवात

गोंदिया ता. 5 जुन :-ऑक्सिजन निर्मित्ती साठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. परिणामी जागतिक तापमान वाढीला आळा बसेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. श्री नायर हे आमगाव तालुक्यातील सुपलीपर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. एक पेड माँ के नाम या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली असून हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे हे होते.
मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम., ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक,आमगाव पंचायत समितीच्या सभापती योगिता पून्ड,गट विकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे, जि. प. सदस्य किशोर महारवाडे, सरपंच रमाताई मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्य जागतिक दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनी गोंदिया जिल्हापरिषदेचे अभिनन्दन केले.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मुरुगानंथम म्हणाले की, जिल्ह्यात एक हजार किलोमीटर क्षेत्रात झाडे लावन्याचा संकल्प आहे.आमच्या पूर्वजानी 50 वर्षापूर्वी जी झाडे जगविली आहेत त्यामुळे आज आम्हाला ऑक्सिजन मिळतो.पृथ्वीचे भविष्य अबाधित राहिल्यास आमचेही भविष्य टिकून राहील त्यामुळे सकारात्मक भूमिका घेऊन सर्वांनी एक पेड माँ के नाम हे अभियान सार्थक करावे असे आव्हान त्यांनी केले. दरम्यान या प्रसंगी बोलताना उपाध्यक्ष श्री हर्षे म्हणाले की ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन जगातील 143 देशांनी पर्यावरणाचे समतोल राखण्याचा कार्यक्रमाची आखणी केली. आता पर्यावर्णाशिवाय तरणोपाय नाही असे सांगून विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी ही झाडे जगविण्याची मोहीम हाती घ्यावी अशी विनंती त्यांनी केली. सुपलीपर येथे सुमारे दोन हजार 800 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम, आणि उपाध्यक्ष हर्षे यांचे सह उपस्थित पाहुणे आणि नागरिकांनी स्वहस्ते झाडांची लागवड करून या अभियानाची सुरुवात झाली..कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र अतकरे यांनी केले. संचालन करून शिक्षक जैपाल ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.