khemendra katre
गोंदिया,berartimes.com दि.२०-गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज(दि.२०)कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती यांचा मतदारसंघ असलेल्या रतनारा जिल्हा परिषद गटातील दवनीवाडा येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनाकडे बघितल्यावर मात्र हा मेळावा शेतकरी व कृषीमित्राएैवजी या मेळाव्याच्या निधीवरच आयोजकांची नजर होती असे चित्र बघावयास मिळाले.
त्यातच नियोजन शुन्यतेचा अभाव अवाजवी दराने घेतलेले जेवणासह मंडपाचे(दीड लाखाचे जेवण,दीड लाखाचे मंडप व २० हजाराचे बिस्किट) दराने खर्चावरील नियंत्रणाचे पितळच उघडे पडले.काही पदाधिकाèयांनी निव्वळ मी मंत्र्यांना आणतो काय होते हा रुबाब दाखविण्यासाठी मात्र इयत्ता दहावीच्या मुलांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचेही भान तर ठेवलेच नाही बारावीच्या मुलांचेही प्रवेशपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी या मेळाव्यामुळे वितरित न केल्याने त्या विद्याथ्र्यांना मानसिक त्रास आयोजक अधिकारी व पदाधिकारी यांच्यामुळे सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली.अशा ढिसाळ नियोजनासाठी पुढाकार घेणाèयांवर शासनाने अंकुश लावणे गरजेचे झाले आहे.अधिकाèयांवर आपल्या पदाचा व राजकीय नेत्यांचा दबाव घालून निव्वळ मार्च महिन्याआधी निधी खर्च करायचा म्हणून कुठला पदाधिकारी एैनवेळेवर व मनमर्जीने काम करून प्रशासकीय यंत्रणेवर दबाव घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा पदाधिकाèयांवर सुद्धा सरकारने वचक ठेवण्यासाठी आचारसqहतेची गरज निर्माण झाल्याचे आजच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा मेळाव्यावरुन दिसून आले.
शाळेच्या आवारात हा मेळावा घेऊन विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यास बाध्य ठरलेले मात्र शिक्षणाचा दर्जाखालावत चालले असे सांगून शाळा व्यवस्थापन समित्यांना पत्र देणारे तत्पर मुकाअ यांच्याही लक्षात शाळेच्या आवारात हा कार्यक्रम साजरा करताना कसे खटकले नाही हा सुद्धा त्याठिकाणी चर्चेचा विषय झालेला होता.एकीकडे आपणच दर्जा खालावल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे आपल्याच उपस्थितीत मुलांना कार्यक्रमासाठी मंडपात बसवायचे हा कुठला प्रकार असे बोलले जाऊ लागले आहे.