Home विदर्भ शेतकर्‍यांना होणार २४ तास वीजपुरवठा – आ. रहांगडाले

शेतकर्‍यांना होणार २४ तास वीजपुरवठा – आ. रहांगडाले

0

तिरोडा,दि.09ः- शेतकर्‍यांना आवश्यक वीजपुरवठा हा केवळ प्रश्न माझा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ८ ऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी ऊर्जामंत्री व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ८ दिवसात तोडगा काढणार असल्याचे आश्‍वासन आ. विजय रहांगडाले यांनी दिले.
तिरोडा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना ८ तास वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी क्षेत्रातील शेतकर्‍यांनी ८ ऑगस्ट रोजी आ. विजय रहांगडाले यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान, आ. रहांगडाले यांनी आपण देखील एक शेतकर्‍याचा मुलगा असल्याने वीजपुरवठा व शेतीचा संबंधाची चांगल्याप्रकारे जाण असल्याचे सांगून प्रश्न माझा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचा आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ८ तासाऐवजी १२ तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेण्यासाठी मुंबई आजच जात असून त्यांच्यासोबत चर्चा करून शेतकर्‍यांची मागणी पटवून देऊन येत्या आठ दिवसात १२ तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन आ. रहांगडाले यांनी शेतकर्‍यांना दिले.

Exit mobile version