34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांच शूटींग होऊ देणार नाही-नाना पटोले...

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांच शूटींग होऊ देणार नाही-नाना पटोले यांचा इशारा!

0
446

blank

भंडारा,दि.18ः “अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भंडारा येथे काँग्रेसच्या मोर्च्यात सहभागी झाल्यानंतर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारनं आलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात भंडारा येथे काँग्रेसच्या वतीने काढलेल्या आंदोलनात पटोले सहभागी झाले होते.पुढे बोलताना ते म्हणाले, मनमोहन सिंग सरकारच्या काळात टिवटिव करत होते. तसंच त्यांनी आता मोदी सरकारच्या काळातील अन्याय अत्याचाराविरोधात आपली भूमिका मांडावी आणि नाही मांडली तर त्यांचे सिनेमा महाराष्ट्रात बंद पाडू.

blank