चंद्रपूर--महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून महागाईच्या विरोधात १२ ते १७ जुलैपयर्ंत स्वाक्षरी अभियान राबवण्याचे आदेश महाराष्ट्र काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी दिले त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस चंद्रपूर च्या वतीने हे अभियान शहरात राबवण्यात आले.
या अभियानाची सुरवात १२ जुलै ला जिल्हापरिषद समोरील पेट्रोल पंपा वरून करण्यात आली त्यानंतर जनता कॉलेज पेट्रोल पंप, वरोरा नाका चौक या ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले आज शेवटल्या दिवशी हे अभियान हे अभियान जेटपूरा गेट ते गोल बाजार या ठिकाणी राबवण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान शहरात राबवण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांची स्वाक्षरी महागाई विरोधात फार्म वर घेतली. या स्वाक्षर्या घेताना लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून आला. त्यामुळे येणारे दिवस हे मोदी सरकारसाठी कठीण असून या पुढेदेखील महिला काँग्रेस प्रचंड जनआंदोलन या मुद्दय़ावर करणार आहेत. जनतेचा हा रोष केंद्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हजार पेक्षा अधिक लोकांशी सरळ संवाद साधत त्यांच्या स्वाक्षर्या महिला काँग्रेस ने घेतल्या अशी माहिती महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी दिली. या अभियानात महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, शहर ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, कार्यकरणी सदस्य लता बारापात्रे, मुन्नी मुमताज शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला.
|