रोवणीकरिता सोमवारपासून शेतकऱ्यांना मिळणार जलाशयाचे पाणी- आ.विजय रहांगडाले

0
60

चोरखमारा, बोदलकसा व खळबंदा जलाशयाचे मिळणार पाणी

MLA Vijay Rahangdaleतिरोडा, दि.19 : जुलै महिना लागूनही निसर्गाने साथ न दिल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे रोवणे रखडले. पावसाने दडी मारल्यामुळे रोवणीसाठी पाण्याची अडचण उद्भवली व शेतकरी संकटात सापडला. या समस्येची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सोमवार, 19 जुलैपासून तलावाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागास आदेशित केले आहे. त्यामुळे सोमवारपासून रोवणीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

जुलै महिन्यात निसर्ग कोपला की काय, शेतीला लागणार्‍या कमीत कमी प्रमाणाएवढेही पाऊस पडले नाही. बांध्या वाळलेल्या दिसून येत आहेत. पावसाअभावी शेतकर्‍यांची रावणी अडली आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे हेरून आमदार विजय रहांगडाले यांनी चोरखमारा, बोदलकसा व खळबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांचे रोवणे लावण्याकरिता, शेतामध्ये पाण्याची अडचण समजून घेत सोमवार, 19 जुलैपासून  तलावाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागास आदेशित केले आहे. आमदारांच्या आदेशानुसार संबंधित विभागाकडून चोरखमारा, बोदलकसा व खळबंदा जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना सोमवारपासून रोवणीकरिता सोडण्यात येणार आहे.या जलाशयांद्वारे अंदाजे 30 हजार शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांची चिंता दूर होणार असल्याची माहिती आमदार विजय रहांगडाले यांनी दिली आहे.