लखीमपूर मध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेचा निषेध
गोंदिया,दि.11ः- राज्यात महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर खेरी येथील घटनेचा निषेध करून महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्या अनुरूप गोंदिया जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना पाठिंबा व घटनेचा निषेध म्हणून आज गोंदिया बंदचे आयोजन करण्यात आले. आंदोलनाची सुरवात गांधी प्रतिमा येथून करून चांदणी चौक, दुर्गा मंदिर चौक, गोरेलाल चौक, श्री टॉकीज, नेहरू चौक, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर, नवीन प्रशासकीय इमारत समोरील परिसरात समापन करून महामहिम राष्ट्रपती व प्रधानमंत्री, यांना उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.गोंदिया शहरातील व्यापारी वर्गाने मात्र बंदला प्रतिसाद न दिल्याने समिश्र बंद राहिला.देवरी येथे मात्र बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला.सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.चिचगड मार्गावरील चौकात आमदार सहशराम कोरेटेच्या नेतृत्वात सभा घेत लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
गोंदियात दिलेल्या निवेदनात उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेची उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा व मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथील शेतकरी शांततेने आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत होते. आंदोलन सुरु असंताना केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर चारचाकी वाहन चालविल्याने 4 शेतकऱ्यांसह इतर लोकांचा मृत्यु झाला. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. 8 लोक मृत्युमुंखी पडुनही अद्याप या घटनेकडे उत्तर प्रदेश सरकार व केन्द्र सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. आरोपी हा केन्द्र सरकार मधील गृह राज्यमंत्री यांचा मुलगा असल्याने त्याला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मागील 1 वर्षापासून सर्व राज्यातील शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत. या समर्थनार्थ आज गोंदिया जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यात सर्वश्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेन्द्र जैन, काँग्रेसचे प्रदेश महासचिव नामदेव किरसान,शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख मुकेश शिवहरे, पंकज यादव, देवेन्द्रनाथ चौबे,काँग्रेस प्रदेश सचिव पी.जी.कटरे,काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गुप्ता, उषा मेंढे, अषोक सहारे, बाल कृष्णा पटले, चुन्नी बेेन्द्रे, केतन तुरकर, सुनिल लांजेवार,विनीत सहारे, सुनिल भालेराव, हेमतं पंधरे, सचिन शेंडे, मनोहर वालदे, खालीद पठान, रफीक खान, आषा पाटील, रजनी गौतम, जितेश राणे, जहीर अहमद, आलोक मोंहती, निलम हलमारे, योगेश अग्रवाल, हरीष तुलसकर, अमित भालेराव, आषिश नागपुरे, राजीव ठकरेले, रवि चौरसिया, पप्पु पटले, प्रीती देशमुख, चौहानताई, जाबीर षेख, टोकेष हरिणखेडे, गुड्डू उके, राजु काळे, विक्की बोमचरे, इकबाल सैय्यद, आशु मक्कड, दिल्लू गुप्ता, विनीत मोहिते, गोलु दोहरे, पिंटु बावनकर, अजय हलमारे, भगत ठकरानी, विषाल षेंडे, गणेश बरडे, अखिलेश सेंठ, राजु जैन, विजेन्द्र जैन, मोहन पटले, भद्दु पठान, सुनिल गुप्ता, राजेष दवे, लवली होरा, रमेश कुरील,दिपक कनोजे, विनायक शर्मा, राकी यादव, कालु चौहान,एकनाथ वहीले, संजीव राय, नितीन टेंभरे, रवि पटले,सोनु मोहरकर, सौरभ रोकडे, कृष्णा भांडारकर, करण टेकाम, हरीराम आसवानी, गंगाराम बावनकर, दिपक नारनवरे, सुनिल पटले, शैलेश वासनिक, दिलप्रित होरा, विनायक खैरे, योगेष मामा बंसोड, नसरूद्दीन अगवान, महेश करियार, सतिश कोल्हे, योगेश दर्वे, शिव नेवारे, नागो बंसोड, अषेाक जैन,नागरतन बंसोड, प्रदीप ठवरे, सुरेष कावळे, लता रहांगडाले, सुदर्षन वर्मा, पुस्ताकला माने,उशाताई मेश्राम, पिंटु कटरे, सोमन मेश्राम, डॉ.मोहीत गौतम, कान्हा बघेले, विषाल ठाकुर, लक्ष्मीकांत डहाट,योगेष पतहे, सतीष पारधी, दर्पण वानखेडे, विजय रहांगडाले, आत्माराम चिखलोंढे, लक्ष्मी चिखलौंढे, चंदन कटरे, प्रतिक हरिणखेडे, कपील बावनथडे, कुणाल बावनथडे, षरद मिश्रा, प्रमोद कोसरकर, रमन ऊके, अजय जामरे, लव माटे, लखन बहेलिया, पवन धावडे, योगेष दर्वे, वामन गेडाम,गुणवंत मेश्राम, रौनक ठाकुर, नरेन्द्र बेलगे, विकास गेडाम, पवन धावडे, मुनेश्वर कावडे, दिलीप डोंगरे, रामेश्वर चौरागडे, बाबुलाल लांजेवार, हर्षवर्धन मेश्राम, गोविंद लिचडे, सुरेश अंबुले, सुरेश कावळे, मोनू शेख, प्रवीण बीजेवार, विनोद कोसरकर, हितेश पताहे, दिलीप बावनकर, दीपक रीनायत, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.