
अर्जुनी-मोर,दि.22ः अर्जुनी-मोर तालुक्यातील मौजा महागाव येथे कृषि सहाय्यक येळने यांच्या मार्गर्शनाखाली नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आले. त्यावेळी महागाव ग्रा. पं.सरपंच कोवे उपस्थित होते.कृषि सहाय्यक यांनी पाण्याचे महत्त्व पटवून देताना पाणी अडवा पाणी जिरवा या म्हणी प्रमाणे पाणी अडवल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.तसेच गावातील गुरे व वन्यप्राणी यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते.किंबहुना रब्बी पिकांना पाणी देता येते.सरपंच श्री.कोवे यांनी नागरिकांना पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी वनराई बंधारे बांधण्यास आवाहन केले आहे.





