
संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा मोर्चा अडवला
#WATCH | Congress MP Rahul Gandhi detained by police during a protest against the Central government on price rise and unemployment in Delhi pic.twitter.com/TxvJ8BCli9
— ANI (@ANI) August 5, 2022
नवी दिल्ली-महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी रस्त्यापासून संसदेपर्यंत निदर्शने सुरू आहेत. या अंतर्गत संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल व प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन स्तरांमध्ये बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. दरम्यान, सोनिया, राहुल यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून सभागृहात आले आणि त्यांनी केंद्राच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
तत्पूर्वी, सकाळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘तुम्ही हुकूमशाही करत आहात का, इथे रोज लोकशाहीची हत्या होत आहे. या सरकारने 8 वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त केली. काँग्रेसकडून आज देशभरात केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हातावर काळी पट्टी बांधली होती.
#WATCH | They (BJP) think Opposition can be muzzled. As their ministers can't see inflation, we want to show them inflation by marching towards PM house…PM Modi has handed over the assets of country to his friends:Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra
(Source: AICC) pic.twitter.com/PWtH7EC2dI
— ANI (@ANI) August 5, 2022
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
1. प्रत्येक संस्थेत RSSचा माणूस : देशातील माध्यमे, निवडणूक व्यवस्थेच्या आधारे विरोधी पक्ष उभा राहतो, पण देशातील प्रत्येक संस्थेत RSSचा माणूस बसलेला असतो. तो सरकारच्या ताब्यात आहे. आमचे सरकार असताना पायाभूत सुविधा तटस्थ होत्या. आम्ही त्यात हस्तक्षेप केला नाही. आज ते सरकारकडे आहे. कोणी विरोध केला तर केंद्रीय तपास यंत्रणांना त्याच्या विरोधात उभे केले जाते.
2. आठ वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त : लोकशाहीचा जो मृत्यू झाला आहे, त्यावर तुम्हाला काय वाटते? ज्या लोकशाहीला 70 वर्षांत उभारले होते, ती आठ वर्षांत नष्ट करण्यात आली.
3. मी जेवढे खरे बोलेन, तेवढे हल्ले : माझी अडचण ही आहे की मी खरे बोलेन, मी महागाई, बेरोजगारीचा मुद्दा मांडण्याचे काम करेन. जो घाबरतो तो धमकावतो. आज देशाची जी स्थिती आहे, त्याला घाबरतात. त्यांनी पूर्ण केली नाहीत, ते महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहेत. ते जनतेच्या शक्तीला घाबरतात, कारण ते 24 तास खोटे बोलतात.
#WATCH Congress leader Priyanka Gandhi Vadra jumps over a police barricade placed near AICC during party protest against price rise & unemployment in Delhi
She was later detained by police during the Congress protest pic.twitter.com/s7lqYqsnEh
— ANI (@ANI) August 5, 2022
काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे डेरा टाकला आहे. या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार नारेबाजी सुरू आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले होते.
काँग्रेसच्या आंदोलनांशी संबंधित अपडेट्स
- या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसर वगळता संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
- काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सरकार आम्हाला महागाईविरोधात आंदोलन करण्यापासून रोखू इच्छिते, त्यामुळे ते काँग्रेस नेत्यांना सतत त्रास देत आहे.
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, राहुलजी जे म्हणाले, तुम्ही समजून घ्या की देशात काय परिस्थिती आहे. देशातील जनतेला लोकशाहीचा अंत पाहावा लागेल, असे कुणालाही वाटले नसेल. देशात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची दहशत आहे.
- दिल्ली, पाटणा, मुंबई, भोपाळसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात निदर्शने केली.
देशभरातून आले कार्यकर्ते, पावसामुळे त्रस्त
महागाईच्या निषेधार्थ देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले होते. पक्षाच्या मुख्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र पावसामुळे सर्व व्यवस्था विस्कळीत झाली होती. कार्यकर्ते रात्रभर उघड्यावर झोपले.

अकबर रोडवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात
अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सुमारे 300 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी कोणत्याही कामगाराला आत प्रवेश दिला जात नाही.
राज्यांत राजभवनावर मोर्चे
काँग्रेसने निदर्शनांप्रकरणी राज्यांतही रणनीती तयार केली आहे. पक्षाचे नेते राजभवनापर्यंत मार्च काढून राज्यपालांना निवेदन सुपूर्द करतील. निदर्शनांवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पक्षाने ब्लॉक-जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनाही मुख्यालयाबाहेर निदर्शने करुन अटक करवून घेण्याचे निर्देश दिलेत.
#WATCH | Police detain Congress leader Priyanka Gandhi Vadra from outside AICC HQ in Delhi where she had joined other leaders and workers of the party in the protest against unemployment and inflation.
The party called a nationwide protest today. pic.twitter.com/JTnWrrAT9T
— ANI (@ANI) August 5, 2022

खासदारांचा राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा, पीएम हाऊसला घेराव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने दोन पातळ्यांवर कामगिरीसाठी रणनीती तयार केली आहे. सर्वपक्षीय खासदार विजय चौकमार्गे राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढतील. त्याचवेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयापासून पीएम हाऊसपर्यंत जातील. येथे ते पीएम हाऊसचा घेराव करणार आहेत.
#WATCH | Delhi: Congress MPs begin their march from Parliament to Rashtrapati Bhavan to register their protest over inflation and unemployment. Rahul Gandhi also joined the march. pic.twitter.com/f8JfYII2zZ
— ANI (@ANI) August 5, 2022






