39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home मराठवाडा/खान्देश स्वच्छ आणि सुंदर गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

स्वच्छ आणि सुंदर गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

0
28

जळगाव, १ – पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या जीवनातील  महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार असून त्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे आहे. स्वच्छता हीच ईश्वरीय सेवा मानून स्वच्छ आणि सुंदर गाव ही ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

राज्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या महाश्रमदानाच्या कार्यक्रमाची सुरुवात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वग्राम पाळधी येथून झाली. त्यावेळी ते बोलत होते.

blank

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमावर आधारित ‘कचरामुक्त भारत’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवड्यानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. त्यांचाच एक भाग म्हणून ”०१ तारिख, १० वाजता, एक तास,”  या राज्यस्तरीय  मोहिमेसाठी आज स्वच्छतेच्या महाश्रमदानाकरिता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गावातील सर्व शाळा, आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये व  विविध भागात स्वच्छता करण्यासाठी श्रमदान करण्यात आले.

blank